शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

coronavirus : कोरोना व्हायरसचे आर्थिक संकट २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:57 IST

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .

ठाणे - सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आणले आहे.  सर्वत्र लॉग डाऊनची परिस्थिती असतानाच १ नोव्हें.२००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे वास्तत ठाणे जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात की,  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार सतत गडगडत असून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे   आर्थिक नुकसान होत आहे. २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या अंशदायी पेन्शन योजना(डिसीपीएस)/ नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) शेअरबाजाराशी संबंधित आहे. त्याचा आर्थिक फटका या २००५ नंतरच्या शासकीय  कर्मचाऱ्यांनाही बसत आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजना न लावता डीसीपीएस/ एनपीएस ही नवी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम तर शासनाकडून १४ टक्के रक्कम कपात करून त्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस/डिसीपीएस खात्यामध्ये जमा केली जाते. जमा रकमेपैकी ३३.२४ टक्के एसबीआय पेन्शन फंड स्कीम मध्ये,३३.२४ टक्के रक्कम यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशन पेंशन फंड स्कीम मध्ये तर उर्वरित३३.५२ रक्कम एलआयसी पेन्शन फंड स्कीममध्ये राज्य सरकारकडून गुंतवली जात असल्याचे लुटे यांच्या कडून सांगितले जात आहे.  कर्मचाऱ्यांची ही  रक्कम शेअर बाजाराशी संबंधित असल्याने यात सतत चढउतार पाहायला मिळत असतो. परंतु सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्याचा गंभीर परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस शेअर बाजारात सतत घसरण होत असून सोमवारी (ता.२३) रोजी  सेन्सेक्स तब्बल १० टक्क्याने घसरून २९९१ अंकाने खाली घसरला याचा आर्थिक फटका २००५ नंतर च्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना ३५ते४० हजार, वर्ग एकदोनच्या अधिकाऱ्यांचे किमान ६० हजार ते १ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज जुनी पेंशन हक्क संघटनेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष विनोद लुटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळाचा आधार असलेल्या पेंशनची रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अनुसरुन   "सरकारने कर्मचाऱ्यांचा पैसा बेभरवशाच्या शेअर बाजारात न गुंतवता वृद्धापकाळात आधार म्हणून १९८२ ची पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी ही लुटे यांच्या कडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीGovernmentसरकार