शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:49 IST

coronavirus in Maharashtra : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ठाणे  - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तो  निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत . राज्यात लस आणि रेमडीसीव्हरच्या इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना या दोन्हीचा साठा कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे केंद्राशी बोलणे सुरु असून राज्याच्या लोकसंख्येनुसार केंद्राने लस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वडील, पत्नी तसेच स्वतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात जाऊन आज लस घेतली असून यावेळी त्यांनी इतरांना देखील लस घेण्याचे आवाहन केले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील काही लसीकरण सेंटर असाक्षरशः बंद ठेवावी लागली आहे. ठाणे महापालिका हद्दीत तर आज आणि उद्या लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत विचारणा केली असता कोणत्याही परिस्थितीमध्ये लस कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा अधिक वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या भागात अधिक तपासण्या करण्यासोबतच आरोग्य कर्मचारी देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडीसीव्हरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत कोरोना हे मोठे संकट असून सर्वानी एकत्र येऊनच या संकटाचा सामना करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा संकट समयी काळबाजार करण्याची भूमिका योग्य नव्हे असे त्यांनी सांगितले आहे. 

वेळ पडल्यास हॉटेल ताब्यात घेणार कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आता बेड देखील कमी पडत आहे. कोणत्याच नागरिकाला बेड मिळणार नाही अशी एकही तक्रार येता कामा नये यासाठी वेळ पडल्यास पुन्हा एकदा खाजगी हॉटेल्स देखील ताब्यात घेण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEknath Shindeएकनाथ शिंदे