शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:49 IST

coronavirus in Maharashtra : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ठाणे  - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तो  निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत . राज्यात लस आणि रेमडीसीव्हरच्या इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना या दोन्हीचा साठा कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे केंद्राशी बोलणे सुरु असून राज्याच्या लोकसंख्येनुसार केंद्राने लस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वडील, पत्नी तसेच स्वतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात जाऊन आज लस घेतली असून यावेळी त्यांनी इतरांना देखील लस घेण्याचे आवाहन केले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील काही लसीकरण सेंटर असाक्षरशः बंद ठेवावी लागली आहे. ठाणे महापालिका हद्दीत तर आज आणि उद्या लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत विचारणा केली असता कोणत्याही परिस्थितीमध्ये लस कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा अधिक वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या भागात अधिक तपासण्या करण्यासोबतच आरोग्य कर्मचारी देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडीसीव्हरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत कोरोना हे मोठे संकट असून सर्वानी एकत्र येऊनच या संकटाचा सामना करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा संकट समयी काळबाजार करण्याची भूमिका योग्य नव्हे असे त्यांनी सांगितले आहे. 

वेळ पडल्यास हॉटेल ताब्यात घेणार कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आता बेड देखील कमी पडत आहे. कोणत्याच नागरिकाला बेड मिळणार नाही अशी एकही तक्रार येता कामा नये यासाठी वेळ पडल्यास पुन्हा एकदा खाजगी हॉटेल्स देखील ताब्यात घेण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEknath Shindeएकनाथ शिंदे