शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

Coronavirus: वेळेत रुग्णवाहिका आणि उपचार न मिळाल्याने कोरोना लढवय्याचा मृत्यू; ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 20:38 IST

ठाण्यातील राबोडी आकाशगंगा या परिसरात राहणारी एक महिला ही सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होत्या

ठाणे :  मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिके अभावी रुग्णांची मृत्यु होणे असे प्रकार घडत आहेत. या मुद्यांवरून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांन चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर झोपी गेलेल्या महापालिकेने तीन परिमंडळाअंतर्गत 10 ते 15 रुग्णवाहिकेची सुविधेसह टीएमटीच्या मिडी बसेसचे रुपातंर रुग्णवाहिकेमध्ये केले. असे असतांना, देखील शनिवारी ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या व सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट असलेल्या एका महिलेचा रुग्णवाहिका व वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महापालिका हद्दीत रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

ठाण्यातील राबोडी आकाशगंगा या परिसरात राहणारी एक महिला ही सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होत्या. त्यात सोमवार पर्यंत त्या कामावर होत्या. तसेच गुरुवारी 11 जून रोजी त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट केली. 12 जूनरोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांना दूरध्वनी करून टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळविण्यात आले होते. याची माहिती मिळताच, घरातील सदस्यांनी स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयात धाव घेवून, रुग्णवाहिका व रुग्णालयात जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णवाहिका काही वेळेवर मिळाली नाही. तब्बल चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना रुग्णवाहिका मिळाली. त्यात ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेच्या पतीने सायन रुग्णालयाच्या मॅडमला फोन केला असता, त्यांनी सायन हॉस्पीटल येथे आणा असे सागितले. त्यानुसार त्यांना सायन रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासले असता, त्यांचा प्रवासाद्र्म्यांच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या सर्व घटनेमुळे एखाद्या करोना लढवय्या सायन हॉस्पीटल येथे काम करणारा व्यक्तीची हि अवस्था होत असले तर, सर्वसामान्य माणसांची  काय अवस्था असेल? असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे. 

सोमवार पर्यत कामावर गेल्या मंगळवार पासून तब्येत बरी नाही म्हणून गेल्या नाहीत. मंगळवारपासून स्थानिक डॉक्टर कडून उपचार घेतले व रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या खचल्या त्यात उपचार मिळण्यास काहीही कारण नसताना उशीर झाला, वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता - राजेंद्र पद्मन, मृताचे नातेवाईक.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका