शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

Coronavirus: कोरोनाने १० दिवसांत वाढवली ठाणे जिल्ह्यात डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 01:39 IST

ठाणे जिल्ह्यातील स्थिती । ठाणे महापालिका हद्दीत १८३, नवी मुंबईत ११५ रुग्ण वाढले, तर ११२ रुग्ण झाले बरे

पंकज रोडेकर ठाणे : लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपत आला तरी ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून रुग्णसंख्या १० दिवसांत ५११ ने वाढली आहे. ठाणे महापालिका हद्दीत १८३, नवी मुंबईत ११५, कल्याण-डोंबिवलीत ७२ आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४७ नवे रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती चिंताजनक होत असतानाच या कालावधीत ११२ रुग्णांसह कोरोनामुक्त होऊ न घरी परतल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यात १३ मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण ठाणे महापालिका हद्दीत सापडला होता. तेव्हापासून २२ एप्रिलपर्यंत जिल्हाभरात ५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामध्ये १७ जणांचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला होता. तर ९६ जण ठणठणीत बरे होऊन कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर २३ ते २५ एप्रिलदरम्यान प्रतिदिन ४० ते ४५ रु ग्ण सापडले. पण, २६ एप्रिलला ७२ रुग्ण सापडले होते. त्यानंतर आठ दिवसांत चार वेळा ७० च्या पुढेच रु ग्ण सापडल्यामुळे ही संख्या १० दिवसांत ५११ ने वाढून एकूण संख्या ही १०११ च्या वर पोहोचली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे.

दहा दिवसांत उल्हासनगरमध्ये ८, भिवंडीत ७, अंबरनाथ ४, बदलापूर १४ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ११ रुग्ण वाढले आहेत. तर, दगावणाऱ्यांची संख्या १२ ने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १२ नवे रुग्णकेडीएमसी हद्दीतील कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले असून, त्यात पोलीस व सरकारी आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. टिटवाळा पूर्वेतील ३९ वर्षांचा पोलीस, ३२ वर्षांचा पुरुष, २९ वर्षांची महिला आणि ५० वर्षांच्या महिला यांना कोरोना झाला आहे. तसेच मुंबईत कार्यरत असलेल्या व डोंबिवली पूर्वेत राहणाºया ३३ आणि ५३ वर्षांच्या व्यक्तीलाही लागण झाली आहे. कल्याण पूर्वेतील ४३ आणि ३३ वर्षांच्या व्यक्तीलाही संसर्ग झाला असून, ते दोघे मुंबईत कार्यरत आहेत. कल्याण पूर्वेतील ३४ आणि पश्चिमेतील ३५ वर्षांच्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. ते दोघेही मुंबईतील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. याशिवाय कल्याण पश्चिमेतील ३६ वर्षांची व्यक्ती ही मुंबईतील खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यालाही कोरोना झाला आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ६० जणांना उपचारांती घरी सोडले आहे.भिवंडीत तीन नवे रुग्णभिवंडी शहरात शनिवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या १६ वर पोहचली आहे. दरम्यान, पडघा-बोरिवलीतील महिलेला उपचारांनंतर घरी सोडले आहे.शांतीनगर येथील ६० वर्षीय व्यक्ती महिन्यासाठी गुजरात अहमदाबाद येथे गेली होती. तेथून २८ एप्रिलला शांतीनगरमध्ये परतल्यानंतर मनपा आरोग्य विभागाने त्याच दिवशी क्वारंटाइन केंद्रात पाठवले होते. आझमीनगर येथील ३८ वर्षीय व्यक्ती ही आईच्या उपचारांसाठी मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये होती. तेथून परतल्यानंतर त्याला क्वारंटाइन केले होते. तर कामतघर भाग्यनगर येथील २२ वर्षीय महिला मुंबईतील गोवंडी येथे गेली होती. तेथून परतल्यानंतर तिला क्वारंटाइन करण्यात आले होते. शनिवारी या तीनही रु ग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या घरच्यांना भिवंडीतील क्वारंटाइन केंद्रात पाठवले असून हे तिन्ही रु ग्ण राहत असलेला परिसर मनपाने सील केला असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस