शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:31 IST

आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत तब्बल एक लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, जिल्ह्यासाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. एकूण एक लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत तीन हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा मृत्युदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनांसमोर आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातही मार्चपासूनलॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये त्याचा फैलाव जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी होताना दिसून आला. जून आणि जुलैमध्ये तर रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही मिळणे मुश्कील होऊन बसले होते. परंतु, जुलै महिन्याच्या मध्यानंतर आणि आॅगस्टमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक कमी होऊ लागली.

जिल्ह्यातील महापालिकांनी केलेल्या उपाययोजना, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया आदींसह पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय मंडळींनी घेतलेली काळजी, नागरिकांप्रति केलेली जनजागृती यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बºयाच प्रमाणात यश आले आहे. जुलैपर्यंत प्रतिदिन दीड हजार ते दोन हजार रुग्ण आढळत होते. परंतु, आॅगस्ट महिन्यात ही संख्या खाली आली आहे. सोमवारी जिल्ह्यात ८५९ रुग्ण आढळले आहेत. या यशाचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. आता मृत्युदर रोखण्यासाठीही ठाणे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यात एका कोविड सेंटर रुग्णालयापाठोपाठ आता कळवा, मुंब्य्रातही हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनामुक्तीठाणे 22004कल्याण-डोंबिवली 23095नवी मुंबई 19668मीरा-भार्इंदर 9825उल्हासनगर 7059भिवंडी 3612अंबरनाथ 4231बदलापूर 3493ठाणे ग्रामीण 7075

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या