शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

coronavirus: ठाण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्युदराचा आलेख लॉकडाऊनमध्येही चढताच, रुग्णसंख्येतही फारशी घट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 2:35 AM

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व पर्यायाने मृत्यू वाढत असल्याने कडक लॉकडाऊन पुन्हा लागू केला गेला. आता त्याला आठवडाभराची मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जराही कमी झालेला नाही. रुग्णसंख्येतील घट फारच मामुली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नव्हे तर सक्षम वैद्यकीय व्यवस्था उभी करणे, हाच मृत्युदर कमी करण्याचा मार्ग असू शकतो. कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन टोकलिझुमॅब व रेमडेसिविर हीच उपलब्ध नसतील, तर रुग्णांचे मृत्यू कसे रोखले जाणार, असा सवाल लॉकडाऊनच्या फार्समुळे संतापलेले ठाणेकर करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते.त्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णसंख्या व मृत्यूंशी दि. ३ ते ९ जुलैदरम्यान लॉकडाऊनच्या काळातील रुग्णसंख्या व मृत्यूंशी तुलना केली असता लॉकडाऊन सपशेल निरर्थक ठरला आहे.१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णसंख्या व मृत्यू असेठाणे : (३६६/१४), कल्याण-डोंबिवली : (३५०/३), अंबरनाथ : (४५/६), बदलापूर : (३३/०), भिवंडी : (८२/३), उल्हासनगर : (६८/०), मीरा रोड-भाईंदर : (११२/०), नवी मुंबई : (२१८/६), ठाणे ग्रामीण : (५१/१)३ जुलैपासून ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांत लॉकडाऊन लागू झाला. त्या दिवसापासून दररोजची रुग्णसंख्या व मृत्यू याची तुलना अशी :दि. ३ जुलै : ठाणे : (४२०/१७), कल्याण-डोंबिवली : (५६४/३), अंबरनाथ : (१०१/५), बदलापूर : (४८/०), भिवंडी : (६३/४), उल्हासनगर : (१९१/२), मीरा रोड-भाईंदर : (२७६/३), नवी मुंबई : (२५७/८), ठाणे ग्रामीण : (१०८/४)दि. ४ जुलै : ठाणे : (४०८/१७), कल्याण-डोंबिवली : (५५५/५), अंबरनाथ : (९४/१), बदलापूर : (४६/१), भिवंडी : (७७/१), उल्हासनगर : (२१२/३), मीरा रोड-भाईंदर : (१२६/६), नवी मुंबई : (१५७/७), ठाणे ग्रामीण : (१७३/४)दि. ५ जुलै : ठाणे : (३७३/१६), कल्याण-डोंबिवली : (४८२/५), अंबरनाथ : (७४/१२), बदलापूर : (२१/०), भिवंडी : (६९/१), उल्हासनगर : (२५१/१), मीरा रोड-भाईंदर : (३०३/४), नवी मुंबई : (१९१/५), ठाणे ग्रामीण : (११२/३)दि. ६ जुलै : ठाणे : (२६८/१४), कल्याण-डोंबिवली : (४१३/४), अंबरनाथ : (५६/५), बदलापूर : (३८/१), भिवंडी : (८८/०), उल्हासनगर : (१५९/३), मीरा रोड-भाईंदर : (१५७/४), नवी मुंबई : (१६४/८), ठाणे ग्रामीण : (१६७/०)दि. ७ जुलै : ठाणे : (२९६/१६), कल्याण-डोंबिवली : (३८१/७), अंबरनाथ : (५१/३), बदलापूर : (६२/१), भिवंडी : (३०/०), उल्हासनगर : (११९/१), मीरा रोड-भाईंदर : (१६१/४), नवी मुंबई : (११५/८), ठाणे ग्रामीण : (१२४/५)दि. ८ जुलै : ठाणे : (४१०/१७), कल्याण-डोंबिवली : (४७१/७), अंबरनाथ : (७५/४), बदलापूर : (८५/१), भिवंडी : (९५/६), उल्हासनगर : (१७२/०), मीरा रोड-भाईंदर : (१७५/४), नवी मुंबई : (२०७/९), ठाणे ग्रामीण : (१०७/३)09 जुलैठाणे : (३४८/१६), कल्याण-डोंबिवली : (५८०/६), अंबरनाथ : (५०/२), बदलापूर : (३६/१), भिवंडी : (५१/८), उल्हासनगर : (१६४/३), मीरा रोड-भाईंदर : (१८५/२), नवी मुंबई : (२३९/९), ठाणे ग्रामीण : (१४०/३)आकडेवारी पाहिली तर ठाणे शहरात दररोज साधारण १४ ते १७ रुग्णांचा मृत्यू होत आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज साधारण होणारे मृत्यू लॉकडाऊन काळात वाढले आहेत. साधारण सात व्यक्ती रोज मरण पावत आहेत.अंबरनाथ-बदलापूरमधील मृत्युसंख्येत फार फरक पडलेला नाही. भिवंडीतील मृत्यू वाढले आहेत. उल्हासनगर, मीरा-भार्इंदरच्या मृत्यूमध्ये फार फरक पडलेला नाही. दररोज ३ ते ७ व्यक्ती या दोन्ही शहरांत मरण पावत आहेत.नवी मुंबईतही दररोज सात ते नऊ व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. तीच गत ठाणे ग्रामीणची असून तेथेही दररोज तीन ते पाच व्यक्ती दगावत आहेत. केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मृत्यू रोखण्यास सांगितले होते. लॉकडाऊनमुळे त्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे