शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:28 IST

केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून, रुग्णसंख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के असले, तरी मृत्युदर मागील काही महिन्यांच्या तुलनेत १.०८ टक्क्यांनी वाढला आहे. आधी १.०९ टक्के असलेला मृत्युदर सध्या २.१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी हद्दीतील मृत्युदर कमी असल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केला आहे.केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. १४ मार्च ते ८ जूनपर्यंत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जूनअखेरीस ही संख्या पाच हजार १३ ने वाढून सहा हजार ५७५ वर पोहोचली. तर, मृतांची संख्या १२० झाली. सुरुवातीला प्रतिदिन दोनचार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. त्यावेळी मृत्युदर हा १.०९ टक्के होता. परंतु, अनलॉक झाल्यापासून कोरोनामुळे दररोज सरासरी नऊ ते ११ दरम्यान मृत्यू होत आहेत. परिणामी, मृत्युदर २.१७ टक्क्यांवर गेला आहे. ३ सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४ पर्यंत गेली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, २६ हजार ११२ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असले तरी, आतापर्यंतची मृतांची संख्या ६५६ झाली आहे.केडीएमसी हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबरच मनपा हद्दीतील जे रुग्ण मुंबईसह उपनगरांत उपचार घेत आहेत, त्यांचाही मृत्यूनंतर केडीएमसीच्या संख्येत समावेश होत आहे. तर, अनलॉक आणि नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाची लक्षणे आढळलेले रुग्ण वेळेवर कोरोनाची चाचणी करीत नाहीत. डेंग्यू आणि मलेरिया झाल्याचा समज करून कोरोनाची चाचणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण पुढे गंभीर बनतो आणि पुढे त्याला अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागतात. जर, त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच डायलेसिस करावे लागत असेल, तर गंभीर अवस्थेतील रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. हेच कारण मृतांची संख्या वाढण्यामागे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.वेळीच उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, कोरोनाचे निदान करण्यासाठी अ‍ॅण्टीजेनसारख्या मोफत चाचण्या केडीएमसीकडून सर्वत्र होत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तसेच उपचारासाठी येणाºया तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना फॅमिली डॉक्टरांनी कराव्यात, असे आवाहन केडीएमसीच्या साथरोग प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे