शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:28 IST

केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून, रुग्णसंख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के असले, तरी मृत्युदर मागील काही महिन्यांच्या तुलनेत १.०८ टक्क्यांनी वाढला आहे. आधी १.०९ टक्के असलेला मृत्युदर सध्या २.१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी हद्दीतील मृत्युदर कमी असल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केला आहे.केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. १४ मार्च ते ८ जूनपर्यंत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जूनअखेरीस ही संख्या पाच हजार १३ ने वाढून सहा हजार ५७५ वर पोहोचली. तर, मृतांची संख्या १२० झाली. सुरुवातीला प्रतिदिन दोनचार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. त्यावेळी मृत्युदर हा १.०९ टक्के होता. परंतु, अनलॉक झाल्यापासून कोरोनामुळे दररोज सरासरी नऊ ते ११ दरम्यान मृत्यू होत आहेत. परिणामी, मृत्युदर २.१७ टक्क्यांवर गेला आहे. ३ सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४ पर्यंत गेली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, २६ हजार ११२ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असले तरी, आतापर्यंतची मृतांची संख्या ६५६ झाली आहे.केडीएमसी हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबरच मनपा हद्दीतील जे रुग्ण मुंबईसह उपनगरांत उपचार घेत आहेत, त्यांचाही मृत्यूनंतर केडीएमसीच्या संख्येत समावेश होत आहे. तर, अनलॉक आणि नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाची लक्षणे आढळलेले रुग्ण वेळेवर कोरोनाची चाचणी करीत नाहीत. डेंग्यू आणि मलेरिया झाल्याचा समज करून कोरोनाची चाचणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण पुढे गंभीर बनतो आणि पुढे त्याला अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागतात. जर, त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच डायलेसिस करावे लागत असेल, तर गंभीर अवस्थेतील रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. हेच कारण मृतांची संख्या वाढण्यामागे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.वेळीच उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, कोरोनाचे निदान करण्यासाठी अ‍ॅण्टीजेनसारख्या मोफत चाचण्या केडीएमसीकडून सर्वत्र होत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तसेच उपचारासाठी येणाºया तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना फॅमिली डॉक्टरांनी कराव्यात, असे आवाहन केडीएमसीच्या साथरोग प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे