शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:28 IST

केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून, रुग्णसंख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के असले, तरी मृत्युदर मागील काही महिन्यांच्या तुलनेत १.०८ टक्क्यांनी वाढला आहे. आधी १.०९ टक्के असलेला मृत्युदर सध्या २.१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी हद्दीतील मृत्युदर कमी असल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केला आहे.केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. १४ मार्च ते ८ जूनपर्यंत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जूनअखेरीस ही संख्या पाच हजार १३ ने वाढून सहा हजार ५७५ वर पोहोचली. तर, मृतांची संख्या १२० झाली. सुरुवातीला प्रतिदिन दोनचार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. त्यावेळी मृत्युदर हा १.०९ टक्के होता. परंतु, अनलॉक झाल्यापासून कोरोनामुळे दररोज सरासरी नऊ ते ११ दरम्यान मृत्यू होत आहेत. परिणामी, मृत्युदर २.१७ टक्क्यांवर गेला आहे. ३ सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४ पर्यंत गेली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, २६ हजार ११२ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असले तरी, आतापर्यंतची मृतांची संख्या ६५६ झाली आहे.केडीएमसी हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबरच मनपा हद्दीतील जे रुग्ण मुंबईसह उपनगरांत उपचार घेत आहेत, त्यांचाही मृत्यूनंतर केडीएमसीच्या संख्येत समावेश होत आहे. तर, अनलॉक आणि नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाची लक्षणे आढळलेले रुग्ण वेळेवर कोरोनाची चाचणी करीत नाहीत. डेंग्यू आणि मलेरिया झाल्याचा समज करून कोरोनाची चाचणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण पुढे गंभीर बनतो आणि पुढे त्याला अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागतात. जर, त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच डायलेसिस करावे लागत असेल, तर गंभीर अवस्थेतील रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. हेच कारण मृतांची संख्या वाढण्यामागे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.वेळीच उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, कोरोनाचे निदान करण्यासाठी अ‍ॅण्टीजेनसारख्या मोफत चाचण्या केडीएमसीकडून सर्वत्र होत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तसेच उपचारासाठी येणाºया तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना फॅमिली डॉक्टरांनी कराव्यात, असे आवाहन केडीएमसीच्या साथरोग प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे