शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

coronavirus: बदलापूरमध्ये सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र, २४ तासांत मिळणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:44 IST

येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली.

बदलापूर : बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील कोरोना रुग्णांची चाचणी आता लवकरच बदलापूरमध्ये केली जाणार आहे. येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. ठाण्याच्या पुढे सुरू होणारे शासनाचे हे पहिले कोरोना चाचणी केंद्र आहे. या केंद्रामुळे २४ तासांत अहवाल मिळणार आहे.मुंबई, ठाणे परिसरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील रुग्णांच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅबचे सॅम्पल घेऊन जे.जे. रुग्णालयात जावे लागत आहे. आधीच मुंबई येथील चाचणीसाठी गर्दी, त्यात या भागांतून जाणारे सॅम्पल वाढत आहेत. त्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी प्रचंड वेळ लागत आहे. हा विलंब टाळण्यासाठी आणि या भागातील रुग्णांना तत्काळ चाचणी अहवाल मिळून वेळीच योग्य ते उपचार मिळावे, यासाठी बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये चाचणी होऊन २४ तासांत अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे होणार आहे.बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील रुग्णांची फार मोठी सोय होणार आहे. मुंबई येथे जाण्याचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.ऑक्सिजनविना कोरोनाग्रस्तांची तडफडबदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना याठिकाणी आरोग्यव्यवस्था कूचकामी ठरत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांना ऑक्सिजनची कोणतीच सुविधा बदलापूरमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे ऑक्सिजनविना येथील रुग्णांची तडफड सुरू झाली आहे. बदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्यावर गेली असून रोज ४० ते ५० रुग्ण नव्याने सापडत आहेत. त्यातील काही रुग्णांची प्रकृती ही गंभीर असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शहरातील कोणतेच रुग्णालय पुढे येत नाही.पालिकेच्या केअर सेंटरमध्ये लक्षणे असलेल्या परंतु कोणताही त्रास होत नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. उपचार घेत असताना श्वसनाचा त्रास झाल्यास त्या रुग्णाला थेट सिव्हिल रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सिव्हिल रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढल्याने तेथे जागा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनाच रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देत आहेत. काही रुग्णांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवून आपली जबाबदारी झटकत आहेत. या सर्व प्रकारामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूरthaneठाणे