शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

coronavirus: बदलापूरमध्ये सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र, २४ तासांत मिळणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:44 IST

येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली.

बदलापूर : बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील कोरोना रुग्णांची चाचणी आता लवकरच बदलापूरमध्ये केली जाणार आहे. येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. ठाण्याच्या पुढे सुरू होणारे शासनाचे हे पहिले कोरोना चाचणी केंद्र आहे. या केंद्रामुळे २४ तासांत अहवाल मिळणार आहे.मुंबई, ठाणे परिसरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील रुग्णांच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅबचे सॅम्पल घेऊन जे.जे. रुग्णालयात जावे लागत आहे. आधीच मुंबई येथील चाचणीसाठी गर्दी, त्यात या भागांतून जाणारे सॅम्पल वाढत आहेत. त्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी प्रचंड वेळ लागत आहे. हा विलंब टाळण्यासाठी आणि या भागातील रुग्णांना तत्काळ चाचणी अहवाल मिळून वेळीच योग्य ते उपचार मिळावे, यासाठी बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये चाचणी होऊन २४ तासांत अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे होणार आहे.बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागांतील रुग्णांची फार मोठी सोय होणार आहे. मुंबई येथे जाण्याचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.ऑक्सिजनविना कोरोनाग्रस्तांची तडफडबदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना याठिकाणी आरोग्यव्यवस्था कूचकामी ठरत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांना ऑक्सिजनची कोणतीच सुविधा बदलापूरमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे ऑक्सिजनविना येथील रुग्णांची तडफड सुरू झाली आहे. बदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्यावर गेली असून रोज ४० ते ५० रुग्ण नव्याने सापडत आहेत. त्यातील काही रुग्णांची प्रकृती ही गंभीर असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शहरातील कोणतेच रुग्णालय पुढे येत नाही.पालिकेच्या केअर सेंटरमध्ये लक्षणे असलेल्या परंतु कोणताही त्रास होत नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. उपचार घेत असताना श्वसनाचा त्रास झाल्यास त्या रुग्णाला थेट सिव्हिल रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सिव्हिल रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढल्याने तेथे जागा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनाच रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देत आहेत. काही रुग्णांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवून आपली जबाबदारी झटकत आहेत. या सर्व प्रकारामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूरthaneठाणे