शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 05:17 IST

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ ...

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ तर मृतांचा आकडा १२२१ झाला. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.शनिवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ५५५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ६०४ तर, मृतांची १३५ झाली. ठाणे महानगरपालिका हद्दीत ४०८ बाधितांसह १७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ३५८ तर मृतांची ३८६ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १५७ नव्या रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ८५९ तर मृतांचा आकडा २३९ वर पोहोचला. मीरा -भार्इंदरमध्ये १२६ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ११ तर मृतांची १५८ पोहचली. भिवंडीत ७७ बाधितांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार २५० तर मृतांची ११९ वर पोहोचली. उल्हासनगरात २१२ नव्या रुग्णांसह तिघांचा मृत्य झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५५९ तर मृतांची ५२ झाली. अंबरनाथमध्ये ९४ नवे रुग्ण सापडले असून एकाचा या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १२६ तर मृतांची ५८ झाली आहे. बदलापूरमध्य ४६ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या ९५२ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात १७३ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८० तर मृतांचा आकडा ५८ पोहचला आहे.रायगड जिल्ह्यात एका दिवशी २६१ रुग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी २६१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांची संख्या ४,९२४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला.शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२३, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण १३, अलिबाग ००, कर्जत ०३, पेण २३, खालापूर १७, माणगाव ०४, रोहा ०८, मुरुड ०२, म्हसळा ०८, पोलादपूर ०१, सुधागड ०१ असे एकूण २६१ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. तर दिवसभरात पनवेल मनपा- ६३, पनवेल ग्रामीण- ४९, उरण- ६, कर्जत-०९, मुरुड-०१, तळा-०१, रोहा-०१, सुधागड-००, श्रीवर्धन-०६ असे एकूण १३६ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी २७७४ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १४९ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २१५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नवी मुंबईमध्ये सात जणांचा मृत्यूनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या २३९ झाली आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. शनिवारी ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी दोन व तुर्भे, बेलापूरसह घणसोलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.च्आतापर्यंत तुर्भेमध्ये ५०, बेलापूरमध्ये २४, नेरुळमध्ये २६, वाशीमध्ये २२, कोपरखैरणेमध्ये ४३, घणसोलीमध्ये २५, ऐरोलीमध्ये ३४ व दिघामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी २५७ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या ७,६०२ झाली आहे. १५० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, आतापर्यंत ४,२६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे