शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 05:17 IST

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ ...

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ तर मृतांचा आकडा १२२१ झाला. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.शनिवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ५५५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ६०४ तर, मृतांची १३५ झाली. ठाणे महानगरपालिका हद्दीत ४०८ बाधितांसह १७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ३५८ तर मृतांची ३८६ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १५७ नव्या रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ८५९ तर मृतांचा आकडा २३९ वर पोहोचला. मीरा -भार्इंदरमध्ये १२६ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ११ तर मृतांची १५८ पोहचली. भिवंडीत ७७ बाधितांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार २५० तर मृतांची ११९ वर पोहोचली. उल्हासनगरात २१२ नव्या रुग्णांसह तिघांचा मृत्य झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५५९ तर मृतांची ५२ झाली. अंबरनाथमध्ये ९४ नवे रुग्ण सापडले असून एकाचा या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १२६ तर मृतांची ५८ झाली आहे. बदलापूरमध्य ४६ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या ९५२ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात १७३ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८० तर मृतांचा आकडा ५८ पोहचला आहे.रायगड जिल्ह्यात एका दिवशी २६१ रुग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी २६१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांची संख्या ४,९२४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला.शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२३, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण १३, अलिबाग ००, कर्जत ०३, पेण २३, खालापूर १७, माणगाव ०४, रोहा ०८, मुरुड ०२, म्हसळा ०८, पोलादपूर ०१, सुधागड ०१ असे एकूण २६१ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. तर दिवसभरात पनवेल मनपा- ६३, पनवेल ग्रामीण- ४९, उरण- ६, कर्जत-०९, मुरुड-०१, तळा-०१, रोहा-०१, सुधागड-००, श्रीवर्धन-०६ असे एकूण १३६ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी २७७४ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १४९ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २१५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नवी मुंबईमध्ये सात जणांचा मृत्यूनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या २३९ झाली आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. शनिवारी ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी दोन व तुर्भे, बेलापूरसह घणसोलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.च्आतापर्यंत तुर्भेमध्ये ५०, बेलापूरमध्ये २४, नेरुळमध्ये २६, वाशीमध्ये २२, कोपरखैरणेमध्ये ४३, घणसोलीमध्ये २५, ऐरोलीमध्ये ३४ व दिघामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी २५७ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या ७,६०२ झाली आहे. १५० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, आतापर्यंत ४,२६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे