शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 05:17 IST

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ ...

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ तर मृतांचा आकडा १२२१ झाला. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.शनिवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ५५५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ६०४ तर, मृतांची १३५ झाली. ठाणे महानगरपालिका हद्दीत ४०८ बाधितांसह १७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ३५८ तर मृतांची ३८६ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १५७ नव्या रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ८५९ तर मृतांचा आकडा २३९ वर पोहोचला. मीरा -भार्इंदरमध्ये १२६ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ११ तर मृतांची १५८ पोहचली. भिवंडीत ७७ बाधितांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार २५० तर मृतांची ११९ वर पोहोचली. उल्हासनगरात २१२ नव्या रुग्णांसह तिघांचा मृत्य झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५५९ तर मृतांची ५२ झाली. अंबरनाथमध्ये ९४ नवे रुग्ण सापडले असून एकाचा या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १२६ तर मृतांची ५८ झाली आहे. बदलापूरमध्य ४६ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या ९५२ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात १७३ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८० तर मृतांचा आकडा ५८ पोहचला आहे.रायगड जिल्ह्यात एका दिवशी २६१ रुग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी २६१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांची संख्या ४,९२४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला.शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२३, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण १३, अलिबाग ००, कर्जत ०३, पेण २३, खालापूर १७, माणगाव ०४, रोहा ०८, मुरुड ०२, म्हसळा ०८, पोलादपूर ०१, सुधागड ०१ असे एकूण २६१ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. तर दिवसभरात पनवेल मनपा- ६३, पनवेल ग्रामीण- ४९, उरण- ६, कर्जत-०९, मुरुड-०१, तळा-०१, रोहा-०१, सुधागड-००, श्रीवर्धन-०६ असे एकूण १३६ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी २७७४ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १४९ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २१५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नवी मुंबईमध्ये सात जणांचा मृत्यूनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या २३९ झाली आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. शनिवारी ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी दोन व तुर्भे, बेलापूरसह घणसोलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.च्आतापर्यंत तुर्भेमध्ये ५०, बेलापूरमध्ये २४, नेरुळमध्ये २६, वाशीमध्ये २२, कोपरखैरणेमध्ये ४३, घणसोलीमध्ये २५, ऐरोलीमध्ये ३४ व दिघामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी २५७ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या ७,६०२ झाली आहे. १५० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, आतापर्यंत ४,२६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे