शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus: प्रवासाची संधी हुकल्याने कामगारांचा गोंधळ; पाटणापर्यंत विशेष गाडीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:43 IST

नावनोंदणीसाठी परप्रांतीयांची पहाटेपासून गर्दी

भिवंडी : परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भिवंडीतून गोरखपूर, जयपूर येथील कामगारांना घेऊन जाणारी श्रमिक गाडी रवाना झाल्यानंतर पाटणापर्यंत विशेष गाडी सोडण्याचे नियोजन मंगळवारी सुरू असून त्यासाठी पहाटेपासून पोलिसांनी नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित आलेल्या मजुरांची नोंदणी पूर्ण झाल्याने काहींना माघारी पाठविले. त्यामुळे कामतघर रस्त्यावर कामगारांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

भिवंडीत अडकून पडलेल्या बिहारमधील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पाटणापर्यंत श्रमिक गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातील सहा पोलीस ठाणे हद्दीत निश्चित केलेल्या ठिकाणी नावनोंदणी सुरू केली असता दोन दिवसांत हजारो नागरिकांनी नोंदणी केली. त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नागरिकांना सकाळी ७ वाजता केंद्रांवर बोलविले त्या ठिकाणी पहाटेपासूनच कामगारांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांकडून अवघ्या काही तासांत रेल्वे प्रवासासाठी आवश्यक नोंदणी झाल्याने अन्य कामगारांना पोलिसांनी माघारी पाठविले.

त्यावर या कामगारांनी संताप व्यक्त करत पोलीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला सकाळी बोलविल्याने आम्ही मुलाबाळांसह या ठिकाणी गावी जाण्याच्या प्रतीक्षेत बसलो होतो; परंतु पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावल्याने आमचा हिरमोड झाला, अशा प्रतिक्रि या मजुरांनी दिल्या.भिवंडीतून जयपूरसाठी ट्रेन रवानालॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी भिवंडी रोड स्थानकातून श्रमिक एक्स्प्रेस सोडण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी गोरखपूरसाठी विशेष ट्रेन रवाना झाली होती. त्यापाठोपाठ सोमवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी दुसरी विशेष ट्रेन जयपूरसाठी रवाना झाली.जयपूरच्या ट्रेनमध्ये एकूण एक हजार २११ कामगार प्रवासी रवाना झाले. त्यांच्याकडून तिकिटाचे ५५५ रु पये भाडे घेण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या जेवणाची व्यवस्था, सेनिटायझर, मास्क इत्यादींची सोय ट्रेनमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन मिळाली याचा आनंद प्रत्येक प्रवासी कामगाराच्या चेहºयावर दिसत होता. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, तर उपस्थित पोलीस, महापालिका, महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत कामगारांना निरोप दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस