शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: प्रवासाची संधी हुकल्याने कामगारांचा गोंधळ; पाटणापर्यंत विशेष गाडीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:43 IST

नावनोंदणीसाठी परप्रांतीयांची पहाटेपासून गर्दी

भिवंडी : परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भिवंडीतून गोरखपूर, जयपूर येथील कामगारांना घेऊन जाणारी श्रमिक गाडी रवाना झाल्यानंतर पाटणापर्यंत विशेष गाडी सोडण्याचे नियोजन मंगळवारी सुरू असून त्यासाठी पहाटेपासून पोलिसांनी नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित आलेल्या मजुरांची नोंदणी पूर्ण झाल्याने काहींना माघारी पाठविले. त्यामुळे कामतघर रस्त्यावर कामगारांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

भिवंडीत अडकून पडलेल्या बिहारमधील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पाटणापर्यंत श्रमिक गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातील सहा पोलीस ठाणे हद्दीत निश्चित केलेल्या ठिकाणी नावनोंदणी सुरू केली असता दोन दिवसांत हजारो नागरिकांनी नोंदणी केली. त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नागरिकांना सकाळी ७ वाजता केंद्रांवर बोलविले त्या ठिकाणी पहाटेपासूनच कामगारांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांकडून अवघ्या काही तासांत रेल्वे प्रवासासाठी आवश्यक नोंदणी झाल्याने अन्य कामगारांना पोलिसांनी माघारी पाठविले.

त्यावर या कामगारांनी संताप व्यक्त करत पोलीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला सकाळी बोलविल्याने आम्ही मुलाबाळांसह या ठिकाणी गावी जाण्याच्या प्रतीक्षेत बसलो होतो; परंतु पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावल्याने आमचा हिरमोड झाला, अशा प्रतिक्रि या मजुरांनी दिल्या.भिवंडीतून जयपूरसाठी ट्रेन रवानालॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी भिवंडी रोड स्थानकातून श्रमिक एक्स्प्रेस सोडण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी गोरखपूरसाठी विशेष ट्रेन रवाना झाली होती. त्यापाठोपाठ सोमवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी दुसरी विशेष ट्रेन जयपूरसाठी रवाना झाली.जयपूरच्या ट्रेनमध्ये एकूण एक हजार २११ कामगार प्रवासी रवाना झाले. त्यांच्याकडून तिकिटाचे ५५५ रु पये भाडे घेण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या जेवणाची व्यवस्था, सेनिटायझर, मास्क इत्यादींची सोय ट्रेनमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन मिळाली याचा आनंद प्रत्येक प्रवासी कामगाराच्या चेहºयावर दिसत होता. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, तर उपस्थित पोलीस, महापालिका, महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत कामगारांना निरोप दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस