शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

Coronavirus : वातावरणबदल ठाणेकरांसाठी ठरु शकतो फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:03 IST

सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.

ठाणे : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हवामानातील बदलही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस उष्णतेची लाट सहन करणाऱ्या ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उष्ण कटिबंधातील देशात हा व्हायरस जास्त फैलावू शकत नाही, असे सांगितले जाते. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.उष्ण कटिबंधातील देशांना किंवा राज्यांना या व्हायरसचा धोका कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात होते. परंतु, मागील काही दिवसांत ठाण्यातील वातावरण वाढत नव्हते. होळी झाल्यानंतर साधारणपणे वातावरणात बदल होताना दिसते. मात्र, यंदा होळीनंतरही जवळजवळ एक आठवडा वातावरण थंड होते. शनिवारपर्यंत दिवसाचे तापमानही २० ते २२ अंश सेल्सिअसपर्यंतच होते. त्यामुळे वातावरणात गारवा दिसत होता. त्यामुळे हे वातावरण बदलावे आणि उष्ण वातावरण सुरू व्हावे, अशी अपेक्षा तमाम नागरिक व्यक्त करीत होते. अखेर, सोमवारी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. शहरातील तापमान जवळजवळ ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अचानक झालेल्या या बदलाचे स्वागत सर्वांनीच केले आहे. आता यामुळे कोरोनाचे सावट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु, तसे होईल का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.सध्या राज्याची परिस्थिती पाहता रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वातावरणबदल हा चांगला असला, तरी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सध्या आपण दुसºया स्टेजवर आहोत. पुढील १५ दिवस खूप काळजीचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.- कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणे