शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus : वातावरणबदल ठाणेकरांसाठी ठरु शकतो फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:03 IST

सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.

ठाणे : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हवामानातील बदलही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस उष्णतेची लाट सहन करणाऱ्या ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उष्ण कटिबंधातील देशात हा व्हायरस जास्त फैलावू शकत नाही, असे सांगितले जाते. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.उष्ण कटिबंधातील देशांना किंवा राज्यांना या व्हायरसचा धोका कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात होते. परंतु, मागील काही दिवसांत ठाण्यातील वातावरण वाढत नव्हते. होळी झाल्यानंतर साधारणपणे वातावरणात बदल होताना दिसते. मात्र, यंदा होळीनंतरही जवळजवळ एक आठवडा वातावरण थंड होते. शनिवारपर्यंत दिवसाचे तापमानही २० ते २२ अंश सेल्सिअसपर्यंतच होते. त्यामुळे वातावरणात गारवा दिसत होता. त्यामुळे हे वातावरण बदलावे आणि उष्ण वातावरण सुरू व्हावे, अशी अपेक्षा तमाम नागरिक व्यक्त करीत होते. अखेर, सोमवारी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. शहरातील तापमान जवळजवळ ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अचानक झालेल्या या बदलाचे स्वागत सर्वांनीच केले आहे. आता यामुळे कोरोनाचे सावट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु, तसे होईल का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.सध्या राज्याची परिस्थिती पाहता रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वातावरणबदल हा चांगला असला, तरी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सध्या आपण दुसºया स्टेजवर आहोत. पुढील १५ दिवस खूप काळजीचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.- कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणे