शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : वातावरणबदल ठाणेकरांसाठी ठरु शकतो फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:03 IST

सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.

ठाणे : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हवामानातील बदलही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस उष्णतेची लाट सहन करणाऱ्या ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उष्ण कटिबंधातील देशात हा व्हायरस जास्त फैलावू शकत नाही, असे सांगितले जाते. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.उष्ण कटिबंधातील देशांना किंवा राज्यांना या व्हायरसचा धोका कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात होते. परंतु, मागील काही दिवसांत ठाण्यातील वातावरण वाढत नव्हते. होळी झाल्यानंतर साधारणपणे वातावरणात बदल होताना दिसते. मात्र, यंदा होळीनंतरही जवळजवळ एक आठवडा वातावरण थंड होते. शनिवारपर्यंत दिवसाचे तापमानही २० ते २२ अंश सेल्सिअसपर्यंतच होते. त्यामुळे वातावरणात गारवा दिसत होता. त्यामुळे हे वातावरण बदलावे आणि उष्ण वातावरण सुरू व्हावे, अशी अपेक्षा तमाम नागरिक व्यक्त करीत होते. अखेर, सोमवारी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. शहरातील तापमान जवळजवळ ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अचानक झालेल्या या बदलाचे स्वागत सर्वांनीच केले आहे. आता यामुळे कोरोनाचे सावट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु, तसे होईल का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.सध्या राज्याची परिस्थिती पाहता रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वातावरणबदल हा चांगला असला, तरी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सध्या आपण दुसºया स्टेजवर आहोत. पुढील १५ दिवस खूप काळजीचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.- कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणे