शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ७२० रुग्ण झाले ठणठणीत, नवी नियमावली ठरतेय फलदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:32 IST

जवळपास ३३ टक्के बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यात नव्या नियमांमुळे दोन दिवसांत तब्बल २७३ बरे झाले आहेत.

ठाणे : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाणे जिल्ह्यातील बाधितांनी सव्वादोन हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जिल्हा रेड झोनमधून बाहेर पडण्याची शक्यता धुसर आहे. मात्र, दुसरीकडे बाधितांपैकी ७२० बाधित हे आता औषधोपचार घेऊन ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत.जवळपास ३३ टक्के बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यात नव्या नियमांमुळे दोन दिवसांत तब्बल २७३ बरे झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत ठामपामधील २०० तर केडीएमसी, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे सव्वाशे ते दीडशेच्याही पुढील रेषा ओलांडलीअसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.ठाणे जिल्ह्यात सहा महानगरपालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत जिल्हा विभागाला गेला आहे. शहापूर-मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती असून, शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्याही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात (लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये-जा करतात. त्यामुळे ही रेल्वे असो, या एसटी स्थानक, गर्दीने गजबजलेली असतात.शहरी भागात म्हणजे ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागात राहून मुंबई, वाशी आणि ठाणे या ठिकाणी नोकरीसाठी जाणाऱ्या शासकीय नोकरदारवर्गाला कोरोनाची लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या नोकरदारांमुळे ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरू लागला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ३७८ जण बाधित आढळून आले असून ६६ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामधील 720 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले.या घरी परतणाºया रुग्णांमध्ये ठामपामध्ये सर्वाधिक 224 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये सोमवारी एकाच दिवशी शंभर जण घरी परतले आहेत.सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या नवी मुंबईत १६९ कोरोनामुक्त झाले आहेत. केडीएमसीत १३०,मीरा- भार्इंदर १४७, बदलापूर २१, ठाणे ग्रामीण १३, अंबरनाथ ७, भिवंडी ५ तसेच उल्हासनगर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.केंद्र मंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार उपचार कालावधीत सुधारणा केल्याने रविवारी आणि सोमवारी तब्बल 273 जण रुग्णांतून घरी परतले आहेत.जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल बाधित रुग्ण ही मोठ्या प्रमाणात येत्या काही दिवसांत घरी जातील. मात्र, नागरिकांनी जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे