शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ७२० रुग्ण झाले ठणठणीत, नवी नियमावली ठरतेय फलदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:32 IST

जवळपास ३३ टक्के बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यात नव्या नियमांमुळे दोन दिवसांत तब्बल २७३ बरे झाले आहेत.

ठाणे : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाणे जिल्ह्यातील बाधितांनी सव्वादोन हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जिल्हा रेड झोनमधून बाहेर पडण्याची शक्यता धुसर आहे. मात्र, दुसरीकडे बाधितांपैकी ७२० बाधित हे आता औषधोपचार घेऊन ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत.जवळपास ३३ टक्के बाधित हे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यात नव्या नियमांमुळे दोन दिवसांत तब्बल २७३ बरे झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत ठामपामधील २०० तर केडीएमसी, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे सव्वाशे ते दीडशेच्याही पुढील रेषा ओलांडलीअसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.ठाणे जिल्ह्यात सहा महानगरपालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत जिल्हा विभागाला गेला आहे. शहापूर-मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती असून, शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्याही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात (लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये-जा करतात. त्यामुळे ही रेल्वे असो, या एसटी स्थानक, गर्दीने गजबजलेली असतात.शहरी भागात म्हणजे ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागात राहून मुंबई, वाशी आणि ठाणे या ठिकाणी नोकरीसाठी जाणाऱ्या शासकीय नोकरदारवर्गाला कोरोनाची लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या नोकरदारांमुळे ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरू लागला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ३७८ जण बाधित आढळून आले असून ६६ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामधील 720 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले.या घरी परतणाºया रुग्णांमध्ये ठामपामध्ये सर्वाधिक 224 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये सोमवारी एकाच दिवशी शंभर जण घरी परतले आहेत.सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या नवी मुंबईत १६९ कोरोनामुक्त झाले आहेत. केडीएमसीत १३०,मीरा- भार्इंदर १४७, बदलापूर २१, ठाणे ग्रामीण १३, अंबरनाथ ७, भिवंडी ५ तसेच उल्हासनगर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.केंद्र मंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार उपचार कालावधीत सुधारणा केल्याने रविवारी आणि सोमवारी तब्बल 273 जण रुग्णांतून घरी परतले आहेत.जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल बाधित रुग्ण ही मोठ्या प्रमाणात येत्या काही दिवसांत घरी जातील. मात्र, नागरिकांनी जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे