शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्ण नव्याने आढळले; दहा जणांचा मृत्यू   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 8:37 PM

उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ६७२ नोंदली असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे. 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ५९२ रुग्णं मंगळवारी आढळले आहेत. तर, १० जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख २४ हजार ७५३ झाली असून मृतांची संख्या पाच हजार ६१९ नोंदली आहे. 

ठाणे शहरात १२१ बाधीत सापडल्याने या शहरात आता ५० हजार१९१ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार २१७ झाली. कल्याण - डोंबिवलीत १७६ रुग्णांची वाढ झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ५२ हजार ९७१ रुग्ण बाधीत असून एक हजार ४७ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.

 उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ६७२ नोंदली असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे. भिवंडीला नऊ बाधीत आढळले असून एक मृत्यू झाला. आता बाधीत सहा हजार १९९ असून मृतांची संख्या ३४१ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६६ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू झाला आहे. या शहरात आता बाधितांची संख्या २३ हजार ८२८ असून मृतांची संख्या ७५३ आहे.

अंबरनाथला १७ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सात हजार ७६३ झाले असून मृतांची संख्या २८५ आहे. बदलापूरमध्ये २३ रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत सात हजार ८५७ आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या ९८ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत ३९ रुग्ण नव्याने वाढले असून एक मृत्यू झाला.ग्रामीण भागात आता १७ हजार ९०२ बाधीत झाले असून ५६१ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस