शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

coronavirus: ठाणे जिल्ह्यात १९५ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू, शहरात रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 02:18 IST

गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी १९५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या दोन हजार ९०३ इतकी झाली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८७ वर पोहोचला आहे.गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.ठामपा हद्दीत सर्वाधिक ७० नवीन रुग्णांची नोंदणी झाली असून येथील रुग्ण संख्या ९१३ झाली आहे. तसेच शहरात पाच जण दगावल्याने मृतांचा आकडा ४२ झाला आहे. तर मीरा-भार्इंदरमध्ये २१ नव्या रुग्णांमुळे रुग्ण संख्या २८६ झाली आहे. उल्हासनगर येथे ११ नवे रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या ७९ झाली असून त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४ वर गेला आहे. ठाणे ग्रामीणमध्येही ९ नवे रुग्णांचे निदान झाल्याने रुग्ण संख्या १२९ झाली आहे. बदलापुरात नवीन ७ रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या ७५ वर गेली आहे. कल्याण- डोंबिवलीत सापडलेल्या ६ नवीन रुग्णांमुळे तेथील रुग्णांचा आकडा ३९१ आहे. एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही ८ वर गेली आहे.अंबरनाथमध्ये ६ नवीन रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या ही २३ झाली आहे. तर एकच नोंदवलेल्या नव्या रुग्णाने भिवंडीतील रुग्णांचा आकडा ३३ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.चार प्रभाग तीन दिवस बंदकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगर, वागळे इस्टेट भाग हा अनिश्चित काळासाठी बंद केल्यानंतर आता माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील प्रभाग १, २, ३ आणि ८ हे परिसरदेखील पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.नवी मुंबईत ६४ नवे रुग्णनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ६४ नवे रुग्ण आढळले असून एकूण संख्या ९७४ झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्यांची संख्या २५५ झाली आहे.गुरुवारी कोपरखैरणेत २०, तुर्भे- सानपाड्यात १५, वाशीत ११, नेरूळमध्ये ४, ऐरोलीत २ व घणसोलीत एक कोरोनामुक्त झाला.शहरातील ७,६५३ जणांची चाचणी करण्यात आली असून तब्बल ५,६२३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गत आठवड्यात प्रलंबित अहवालाचा आकडा १८०० झाला होता. हे प्रमाण आता १०५६ इतके आहे. शहरातील १०३९३ नागरिकांना क्वारंटाइन केले होते. त्यापैकी ८६१६ जणांनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे.नवी मुंबईमध्ये गुरूवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरूळमधील १३, ऐरोलीसह कोपरखैरणेत १२, घणसोली, तुर्भे व बेलापूरमध्ये ५, दिघामध्ये ७ नवीन रुग्ण आढळले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई