शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

coronavirus: ठाणे जिल्ह्यात १९५ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू, शहरात रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 02:18 IST

गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी १९५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या दोन हजार ९०३ इतकी झाली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८७ वर पोहोचला आहे.गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.ठामपा हद्दीत सर्वाधिक ७० नवीन रुग्णांची नोंदणी झाली असून येथील रुग्ण संख्या ९१३ झाली आहे. तसेच शहरात पाच जण दगावल्याने मृतांचा आकडा ४२ झाला आहे. तर मीरा-भार्इंदरमध्ये २१ नव्या रुग्णांमुळे रुग्ण संख्या २८६ झाली आहे. उल्हासनगर येथे ११ नवे रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या ७९ झाली असून त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४ वर गेला आहे. ठाणे ग्रामीणमध्येही ९ नवे रुग्णांचे निदान झाल्याने रुग्ण संख्या १२९ झाली आहे. बदलापुरात नवीन ७ रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या ७५ वर गेली आहे. कल्याण- डोंबिवलीत सापडलेल्या ६ नवीन रुग्णांमुळे तेथील रुग्णांचा आकडा ३९१ आहे. एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही ८ वर गेली आहे.अंबरनाथमध्ये ६ नवीन रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या ही २३ झाली आहे. तर एकच नोंदवलेल्या नव्या रुग्णाने भिवंडीतील रुग्णांचा आकडा ३३ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.चार प्रभाग तीन दिवस बंदकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगर, वागळे इस्टेट भाग हा अनिश्चित काळासाठी बंद केल्यानंतर आता माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील प्रभाग १, २, ३ आणि ८ हे परिसरदेखील पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.नवी मुंबईत ६४ नवे रुग्णनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ६४ नवे रुग्ण आढळले असून एकूण संख्या ९७४ झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्यांची संख्या २५५ झाली आहे.गुरुवारी कोपरखैरणेत २०, तुर्भे- सानपाड्यात १५, वाशीत ११, नेरूळमध्ये ४, ऐरोलीत २ व घणसोलीत एक कोरोनामुक्त झाला.शहरातील ७,६५३ जणांची चाचणी करण्यात आली असून तब्बल ५,६२३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गत आठवड्यात प्रलंबित अहवालाचा आकडा १८०० झाला होता. हे प्रमाण आता १०५६ इतके आहे. शहरातील १०३९३ नागरिकांना क्वारंटाइन केले होते. त्यापैकी ८६१६ जणांनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे.नवी मुंबईमध्ये गुरूवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरूळमधील १३, ऐरोलीसह कोपरखैरणेत १२, घणसोली, तुर्भे व बेलापूरमध्ये ५, दिघामध्ये ७ नवीन रुग्ण आढळले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई