शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात सापडले १४५ नवे रुग्ण तर नवी मुंबईमध्ये ४४ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 04:01 IST

नवी मुंबईमध्ये गुरुवारी ४४ जणांना लागण झाली असून रुग्णसंख्या ४८४ झाली आहे. दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले आहेत.

ठाणे : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी १४५ ने वाढली. यामध्ये सर्वाधिक ६४ रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक हजार ६५८ झाली आहे. तसेच गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४४ वर गेला.

गुरुवारी ठामपा कार्यक्षेत्रात सापडलेल्या ६४ नव्या रुग्णांमध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश असून तेथील रुग्णसंख्या ५५९ झाली आहे. ६४ पैकी ३४ रुग्ण हे लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती परिसरातील आहेत. याखालोखाल नवी मुंबईत ४४ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ४८४ वर पोहोचली आहे. तर केडीएमसीत आढळलेल्या २० रुग्णांमुळे रुग्णसंख्या २५३ झाली आहे. मीरा-भार्इंदर येथे नवे ६ रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णसंख्या दोनशेपार झाली असून ती आता २०२ वर स्थिरावली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ७ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या ६५ वर गेली आहे.बदलापूरला ही तीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ४५ झाली आहे. अंबरनाथ येथे एक रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या १२ झाली आहे.

उल्हासनगर आणि भिवंडीत एकही बाधित न सापडल्याने तेथील रुग्णसंख्या स्थिर असून ती अनुक्रमे १७ आणि २० अशी आहे. तर गुरुवारी दगावलेल्या दोनपैकी एक ठाणे आणि दुसरा मीरा-भार्इंदर या महापालिका कार्यक्षेत्रातील असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

नवी मुंबईमध्ये गुरुवारी ४४ जणांना लागण झाली असून रुग्णसंख्या ४८४ झाली आहे. दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले आहेत.सर्वाधिक १० रुग्ण वाशी विभागात वाढले. कोपरखैरणे व घणसोलीत प्रत्येकी ९, तुर्भे सानपाड्यात ७, नेरूळमध्ये ४ आणि ऐरोलीसह दिघामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला. गुरुवारी एपीएमसीमध्ये नवीन रुग्ण सापडल्याने मार्केट बंद करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. बेलापूरमधील ६, वाशी ३, तुर्भे २ व घणसोलीत, ऐरोलीसह दिघामध्ये प्रत्येकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. सानपाडामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील १,३१२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

डॉक्टरचा कोरोनामुळेच मृत्यूसीवूड सेक्टर ४८ मधील डॉक्टरचा रविवारी व त्यांच्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला होता. गुरुवारी डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्नीच्या रिपोर्ट पुन्हा तपासणीस पाठविला आहे. त्यांच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस