शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४३० रुग्ण नव्याने सापडले, ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 19:32 IST

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे  - जिल्ह्यात एक हजार ४३० रुग्णांची रविवारी नव्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ३० जणांच मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात ३७३ रुग्ण आज नव्याने सापडले आहेत. या शहरात ३८ हजार ३४८ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. तर, सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या एक हजार २४ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली शहरात ३९२ रुग्णांची आज वाढ झाली असून सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४३ हजार ७८४ रुग्ण बाधीत झाले. तर, ८५० मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे.उल्हासनगरला ५० नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ३९९ झाले आहेत. तर,  मृतांची संख्या ३०८ नोंदवण्यात आली आहे. भिवंडीला आज ५२ बाधीत आढळून आले आहेत. तर, आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार २०८ असून मृतांची संख्या ३१३ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १७९ रुग्णांची तर, पाच मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १९ हजा २४९ झाली आहे, तर, मृतांची संख्या ५९२ झाली आहे.अंबरनाथमध्ये ४० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ४९१ झाली असून मृतांची संख्या २३४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ५८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता बाधीत सहा हजार ३९४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ७७ मृत्यूची नोंद कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये एक रुग्ण नव्याने वाढला असून आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत १४ हजार ५२४ आणि मृत्यू ४१३ झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे