शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

CoronaVirus News : ठाण्यात कोरोनाचे थैमान सुरूच; गेल्या 24 तासांत 992 बाधितांसह 42 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 23:04 IST

CoronaVirus News : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 21 जून रोजी सर्वाधिक 254 रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्युची नोंद झाली.

ठळक मुद्देठाणे जिल्हयात बाधितांची संख्या 21 हजार 558 तर मृतांची संख्या 726 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रविवारी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई महापालिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार गेली.

ठाणे:  ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी 992 नवे रुग्ण आढळले असून 42 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ठाणे जिल्हयात बाधितांची संख्या 21 हजार 558 तर मृतांची संख्या 726 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रविवारी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई महापालिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार गेली. बाधितांच्या या वाढत्या संख्येसह  मृतांच्या वाढत्या संख्येमुळेही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 21 जून रोजी सर्वाधिक 254 रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या तीन हजार 512 तर मृतांची संख्या 73 झाली.  त्यापाठोपाठ भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रतही दिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे.  याठिकाणी 170 नव्या रुगांची तर पाच जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची  एक हजार 45 तर  मृतांची आकडा 71 वर पोहचला आहे.  

ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी 164 नवे रुग्ण दाखल झाले.  त्यामुळे येथील बाधितांची संख्या सहा  हजार 296 इतकी झाली. तर 10 जणांच्या मृत्युमुळे मृतांची संख्या 208 वर गेली आहे. नवी मुंबईत 154 नविन रुग्णांची भर पडली. तर सात जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 841 तर मृतांची संख्या 164 झाली आहे.  त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये 106 रुग्णांना दिवसभरात लागण झाली. त्यामुळे याठिकाणी दोन हजार 258 इतकी बाधितांची संख्या झाली आहे. 

सहा जणांच्या मृत्युने ही संख्याही 109 वर गेली आहे. उल्हासनगरमध्ये  51  रुग्णांची तर  दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे  एक  हजार 56 तर मृतांची संख्या 32 झाली. अंबरनाथमध्ये 19 नविन रुग्णांची भर पडली असून पाच जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 139 तर मृतांची संख्या 29 वर गेली आहे. बदलापूरातही नविन 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची संख्या 552 तर दोघांच्या मृत्युमुळे मृतांची संख्या 13 झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात 49  रुग्णांची तर  तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीणमध्ये  बाधितांची संख्या 859 तर  मृतांची संख्या 27 वर गेली आहे.

दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार रविारी 29 मृत्यू झाल्याची नोंद होती. तर पालिकेच्या नोंदीनुसार ही संख्या दहा होती. त्यामुळे याठिकाणी नेमकी मृत्युची संख्या किती याबाबत प्रशासनाकडून नेमके उत्तर मिळू शकले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे