शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

corona virus : ठाणे जिल्ह्यात मृत्यूच्या संख्येत घट, आरोग्य यंत्रणेला दिलासा; गुरुवारी २३ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 09:25 IST

ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत गुरुवारी समाधानकारक घट झाली. जिल्हाभरात ८५९ रुग्णांची नव्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन लाख चार हजार ५१३, तर २३ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या पाच हजार १८१ झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीला २७ बाधित आढळले असून एक मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ११० रुग्णांच्या वाढीसह पाच मृत्यू झाले आहेत. अंबरनाथला २६ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये ३३ रुग्ण सापडले असून दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.

नवी मुंबईत ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी २०२ रुग्ण वाढले असून २५४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के झाले आहे. सद्यस्थितीमध्ये २६१५ रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ८६८ झाला आहे.

रायगडमध्ये २०८ रुग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात गुरुवारी २०८ दिवसभरात कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ०९ जणांचा मृत्यू झाला तर २७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सद्यस्थितीत १८६५ रुग्णांवर उपचार सुरुआहेत.

वसई विरारमध्ये ४ रुग्णांचा मृत्यूवसई-विरार महापालिका हद्दीत गुरुवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला तर १०४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात शहरात १५५ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्तही झाले आहेत. त्यामुळे शहरांत आता फक्त १०८८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू