शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे सावट कमी होतय; नवे रुग्ण अवघे ७३५ तर मृत्यू फक्त बारा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 22:46 IST

Corona Virus :जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील १७० रुग्ण नव्याने वाढले  आहेत. या शहरात आता ४५ हजार ४११ एकूण रुग्ण संख्या झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत कमालीची घट गेल्या पाच दिवसांपासून होत आहे. रविवारी जिल्ह्यात फक्त ७३५ नव्या रुग्णांची वाढ झाली तर अवघे १२ जण दगावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख सात हजार ४१ झाली आहे. मृतांची संख्या पाच हजार २२६ झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

      जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील १७० रुग्ण नव्याने वाढले  आहेत. या शहरात आता ४५ हजार ४११ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १३० झाली. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची आज वाढ झाली असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत ४९ हजार १८२ रुग्ण बाधीत असून ९९३ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.

                         उल्हासनगरला ३० नवे रुग्ण आढळले असून, एका जणाचा मृत्यू झाला आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ९९ झाली असून ३३३ मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. भिवंडीला २३ बाधीत आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ८२६ असून मृतांची संख्या ३३०  आहे. मीरा भाईंदरमध्ये ९९ रुग्णांच्या वाढीसह चार मृत्यू झाले आहेत. या शहरात आता बाधितांची संख्या २२ हजार ४९ झाली असून मृतांची संख्या ६९८ आहे.

          अंबरनाथला १० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत सात हजार १७२ झाले असून मृतांची संख्या २७२ आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत सात हजार १९३ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या ९६ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत २५ रुग्ण नव्याने वाढले असून  एकही  मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागात आता १६ हजार ४८३ बाधीत झाले असून ५०८ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या