शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

CoronaVirus News: लोकल सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 04:31 IST

CoronaVirus News: दररोज वाढतात सरासरी ६६ रुग्ण 

नवी मुंबई/ ठाणे / रायगड / पालघर : रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली केल्यानंतर नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १ ते १२ फेब्रुवारी दरम्यान मनपा क्षेत्रात ७९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापुर्वीच्या १२ दिवसामध्ये ७१३ जणांना कोरोना झाला होता. सरासरीपेक्षा ८१ रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे सेवा सुरू होण्यापुर्वी प्रतिदिन सरासरी ५९ रुग्ण वाढत होते. लोकल सुरु झाल्यानंतर ही प्रमाणे प्रतिदिन सरासरी ६६ झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात ४३५ रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेतला असता १५ जानेवारीला लोकल सेवा सुरू झाली त्या दिवशी अवघे २९७ रुग्ण सापडले. त्यानंतरचे पहिले तीन दिवस अनुक्रमे ३७३, ३२५ आणि २२८ रुग्ण सापडले होते. या तर आताच्या गेल्या काही दिवसांच्या रुग्णसंख्येचा विचार करता शुक्रवारी २९० रुग्ण आढळले असून फक्त दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्या आधी गुरुवारी २७३, बुधवारी ३६४ रुग्ण सापडले होते. ९ फेब्रुवारीला २३६ आणि ८ फेब्रुवारीला केवळ २०० रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत मृतांच्या संख्येचा विचार करता मृतांची संख्या अत्यल्प आढळली. यामुळे लोकल सेवा सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढल्याचे फारसे दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यातील काेराेनाचा कहर कमी झाला आहे. शुक्रवारी  पनवेल महापालिका हद्दील सर्वाधिक ३०, पनवेल ग्रामीणमध्ये ५, पेण तालुक्यात ४ खालापूर तालुक्यात ३ आणि अलिबाग तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील ५५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ६२ हजार ६०६ काेराेना रुग्णांची संख्या झाली आहे, तर ६० हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.विभाग     शुक्रवारची    आकडेवारी ठाणे    २९०नवी मुंबई    ७८रायगड    ४३वसई-पालघर    २४ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या