शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाहेर कोरोनाचा, घरात पाण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 03:00 IST

पावसाने मोठी पडझड : झाडे पडली, घरांसह वाहनांचेही नुकसान, ग्रामीण भागात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनसामान्य अगोदरच त्रासले असताना, दोन दिवसांपासून पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन शासनाकडून केले जात असले तरी, पावसामुळे अनेकांना घरात राहणेही शक्य होत नाही. ठाणे शहरासह मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि उल्हासनगरातही घरांची पडझड झाली असून, अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाहेर कोरोनाचा तर घरात पाण्याचा धोका, अशा दुहेरी संकटात जनसामान्य सापडले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणे तालुका आणि शहर परिसरात पडला. ठाणे शहरात २६ झाडे पडली असून, वागळे ईस्टेटमध्ये एक किराणा दुकान नऊ घरांवर पडून नुकसान झाले. याशिवाय आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या. भिवंडी शहरातील अनेक रस्ते पावसाने उखडले आहेत. येथील ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. कोंडेश्वरजवळील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक घरांची मोठी पडझड झाली. या ग्रामीण भागातील संपूर्ण विद्युत यंत्रणा कोलमडली असून ती दुरुस्त करायला आठवडाभर लागण्याची शक्यता आहे. या भागातील अनेक मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत.डोंबिवलीत बुधवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याशिवाय दिवसभर वारा आणि पावसाचे प्रमाण चांगलेच होते. झाड आणि झाड्याच्या फांद्या पडण्याच्या घटना वगळता शहरात कोणतीही दुर्घटना घडली नाही.उल्हासनगर शहरात जोरदार वाऱ्यासह संततधार पावसाने विजेचा लपंडाव सुरू असून आठपेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. याशिवाय दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या.कल्याण, डोंबिवलीत पावसासह सोसाट्याचा वाराडोंबिवलीत ठिकठिकाणी झाडे पडली : विजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले, बाजारपेठेत शुकशुकाटलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात बुधवारी रात्री सोसाट्याचा वाºयासह जोरदार पाऊस झाला. त्यात अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. गुरुवारी दिवसभरात पावसाच्या लहानमोठ्या सरी कोसळल्या. डोंबिवली पूर्वेत सुनीलनगर आणि पश्चिमेला भावे सभागृहासमोर अशा दोन ठिकाणी झाडे पडली. मनपाच्या आपत्कालीन विभागातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही झाडे हटवली.

कल्याण-डोंबिवलीत सोमवारपासून चांगला पाऊस झाला. गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळलेले होते. अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या. रात्री पडलेल्या पावसामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लोकल सेवेचा अंदाज घेत सकाळी कामावर जाण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी चौकात खासगी कंपन्या व अन्य सरकारी कार्यालयांतील कर्मचाºयांचीही कमी गर्दी होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काहींनी एसटीने मुंबईने गाठली.दुसरीकडे अनलॉकमध्ये सम-विषम पद्धतीने दुकाने उघडली जात आहेत. अनेक दुकानदारांनी सवलती देऊनही ग्राहकांनी पाठ फिरवली. पावसामुळे भाजीमार्केटमध्ये फारसी गर्दी नव्हती. श्रावणी शुक्रवारसाठी फळे, फुले, हार आणि दुग्धजन्य पदार्थांची लोकांनी खरेदी केली. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याRainपाऊस