शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

'दोन दिवसांत अधिवेशन गुडाळायचं असल्यानेच कोरोना वाढलाय'

By महेश गलांडे | Published: February 16, 2021 6:26 PM

आताचं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय आहे, हे कमीत कमी दीड महिनाभर चालतं. पण, अधिवेशन लवकर गुंडाळायचं असेल, म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं असेल, असा आरोपच राणेंनी केलाय.

ठाणे - भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला टार्गेट केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा द्यावा, पण त्याअगोदर सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असे म्हणत नाव न घेता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर प्रहार केला. तर, राज्यातील ाढत्या कोरोना परिस्थितीबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभा अधिवेशन लवकरात लवकर गुंडाळायचं असेल, असे म्हणत राणेंनी सरकारला लक्ष्य केलं 

कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सावरलं. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडेलला यंदाचा अर्थसंकल्प हा देशाला महासत्तेच्या दिशेने नेणारा आहे. देशातील कोरोना स्थिती आता संपुष्टात येताना दिसत आहे. पण, महाराष्ट्रात कोरोना वाढतोय. अधिवेशन जवळ आलं की कोरोना वाढतो, म्हणजे दोन दिवसांतच अधिवेशन संपवता येतं, असं म्हणत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नारायण राणेंनी प्रश्नचिन्ह उभारलं आहे. आताचं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय आहे, हे कमीत कमी दीड महिनाभर चालतं. पण, अधिवेशन लवकर गुंडाळायचं असेल, म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं असेल, असा आरोपच राणेंनी केलाय. आता, दोन दिवसांचं अधिवेशन घेतील आणि मातोश्री या पिंजऱ्यातून ते बाहेर येतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. 

देशाला समृद्ध बनविणारा अर्थसंकल्प

देशातील कोरोना संकटावर मोदींनी मात केलीय, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. जगाच्या पाठिवर मोदींच्या कामाचं कौतुक होतंय. मोदी सरकारनेच दोन लसी निर्माण केल्या, अजूनही 13 नवीन लसी येणार आहेत, असे केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितल्याचं राणेंनी म्हटलं. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा, बेकारी दूर करणारा, महिला सबलीकरण, सैन्याला बळकटी देणारा, देशाला समृद्ध बनविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे राणेंनी म्हटले.    

कुंपणच शेत खातंय

नारायण राणे यांनी इंधन दरवाढ, पूजा चव्हाण आत्महत्या, शिवजयंती, मराठा आरक्षण यांसह विविध मुद्द्यांवरुन शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचं सरकार आल्यापासून त्यांच्या ज्या ज्या मंत्र्यावर आरोप झाले त्यांच काय झालं. सुशांतप्रकरणी दिशाच्या केसमध्ये हत्याऐवजी आत्महत्याच सांगितली. हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देतंय. इथं कुंपनच शेत खातंय, असे म्हणत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राणेंनी शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांर टीका केली.

गुंडांच्या मिरवणुकांना परवानगी

शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता संबंध उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान-स्वाभीमान नसलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांच्यावेळी वेगळी शिवसेना होता, आता संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी दिली जाते. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो, त्याला परवानगी मिळते. मग, शिवजयंतीला परवानगी का नाही मिळत, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच, शिवसेनेच्या सत्तेत साधू-संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना बंदी, पण गुंडांच्या मिरवणूकांना परवानगी आहे, असे म्हणत पुण्यातील मारणेंच्या जल्लोष मिरवणुकीवर राणेंनी टीका केली.    

टॅग्स :thaneठाणेNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या