शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोनाचा परिणाम : खाडी, तलावाचे पाणी झाले स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:32 IST

Thane : मूर्ती विसर्जनामध्ये ३७ टक्के घट नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंमलात आणली.

ठाणे : कोरोनामुळे कधी नव्हे, ते ठाण्यातील खाडीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. सोबतच महापालिकेचे कृत्रिम तलाव आदींच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली, परंतु शहरातील साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता घसरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.गणेशोत्सवात गेल्या वर्षी ३७ हजार ६० मूर्तीचे विसर्जन झाले होते. यावेळी कोरोनामुळे २३ हजार ११७ मूर्तीचे विसर्जन झाले. मूर्ती विसर्जनामध्ये ३७ टक्के घट नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंमलात आणली.

अनेकांनी मातीच्या, तसेच शाडू मातीच्या मूर्तींना पसंती दिली. त्यामुळे जलप्रदूषण कमी झाले. दुसरीकडे पाण्यातील जैविक पर्यावरण निरोगी राहण्यासाठी विरघळलेला ऑक्सिजन ४ मिली ग्रॅम / प्रति लीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे असते. महापालिका क्षेत्रातील ३५ तलावांच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी प्रदूषण नियंत्रण कक्षाने केली. त्यात दिवा तलाव वगळता, उर्वरित सर्व तलावांमध्ये विरघळलेला ऑक्सिजन ४ मिली ग्रॅम / प्रति लीटरपेक्षा जास्त आढळला.

साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता घसरली- महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील वितरण प्रणाली, तसेच साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एप्रिल, २०१९ ते मार्च, २०२० या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने घेतले. - त्यात वितरण प्रणालीच्या पाण्याच्या १२ हजार ९०१ नमुन्यांपैकी ९५ टक्के नमुने पिण्यायोग्य आढळले. ५ टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. - साठवणुकीच्या टाक्यांमधील पाण्याचे १८ हजार ९८८ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के नमुने पिण्यायोग्य, तर २० टक्के नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. - अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वितरण प्रणाली आणि साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता एक टक्क्याने सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणे