शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कोरोना संकटकाळात 170 कुटुंबे झाली बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 1:13 AM

कशेळी येथील अनधिकृत बांधकामावर एमएमआरडीएची कारवाई : नऊ निवासी इमारतींवर हातोडा

नितीन पंडित 

भिवंडी : कशेळी येथील पद्मावती इस्टेटमध्ये असलेल्या नऊ अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी करण्यात आली. विकासक व जागामालक यांच्यातील वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कोरोना काळात झालेल्या या कारवाईमुळे सुमारे १७० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, या कारवाईसाठी नारपोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

विकासक रसिक शाह यांनी कशेळी ग्रामपंचायत हद्दीत पद्मावती इस्टेट नावाचे निवासी संकुल परवानगी न घेता बांधले. जमीन मालक सुनीता मदरानी व इतरांनी विकासकाविरोधात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त राजीव हे २९ एप्रिल रोजी हजर झाले. त्यावेळी अनधिकृत इमारती कशा बांधल्या जाऊ शकतात? यावर एमएमआरडीएने कोणती कारवाई केली किंवा कोणती कारवाई प्रस्तावित आहे? बांधकाम होत असताना डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा प्रस्तावित आहे? भविष्यात असे अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी एमएमआरडीए काय पावले उचलणार आहेत? आदी प्रश्न उपस्थित करुन एमआरडीएने  ६ मे रोजी उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर एमएमआरडीएने  अनधिकृत बांधकाम ६ मेच्या आत तोडण्यात येईल, असे निवेदन न्यायालयासमोर दिले होते.

एमएमआरडीएने कोणतीही सूचना न देता सोमवारी सकाळी थेट इमारती तोडण्याची कारवाई केल्याचा आरोप करुन पद्मावती इस्टेटमधील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यातच नागरिकांची दमछाक होत असताना, ही कारवाई केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. 

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना, हक्काचा निवारा गेल्याने अशा परिस्थितीत आता मुलाबाळांना सोबत घेऊन आश्रय घायचा तरी कुठे, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. 

टॅग्स :thaneठाणेfireआगbhiwandiभिवंडी