शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

वाहन चालकाने सजगतेने नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण शक्य होईल- विवेक फणसळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:16 IST

प्रत्येक जीव मोलाचा आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळा आणि वेगावर तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवा, असे कळकळीचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घघाटन कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांना मदत करणाऱ्या १८ नागरिकांचा सत्कार रस्ता सुरक्षा अभियानास ठाण्यात प्रारंभवाहतूकीचे नियम पाळण्याची विद्यार्थ्यांना आयुक्तांनी दिली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहन चालकांनी सजगतेने नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल. त्यातून अपघातांमध्ये जखमी आणि मृत पावणाऱ्यांची संख्याही कमी होईल. त्यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळा आणि वेगावर नियंत्रण ठेवा असे कळकळीचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी वाहतूक शाखेच्या कार्यक्रमात केले.रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना फणसळकर यांनी हे आवाहन केले. यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना आपल्या व्यस्त कामातूनही मदत करणाºया नागरिकांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मार्गदर्शन करतांना सुरुवातीलाच आयुक्तांनी वाहतूकीचे नियम पाळण्याची शपथ विद्यार्थ्यांसह उपस्थितांकडून वधवून घेतली. त्यास सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फणसळकर पुढे म्हणाले, वाहतूक पोलीस हे ३६५ दिवस वाहतूकीच्या नियमांचे महत्व सांगत असतात. प्रत्येकाचा जीव मोलाचा आहे. त्यामुळेच वाहन चालकांशी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष संपर्क अभियान राबविले आहे. त्यासाठी अनेक सोसायटयांमधूनही पोलिसांनी चालकांचे उद्धबोधन केले आहे. मॉल तसेच गर्दीच्या ठिकाणी हेल्मेट परिधान करण्यासह सीट बेल्ट लावणे आणि सिग्नल न तोडण्याबाबत जनजागृती केल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दहा टक्के अपघात कमी करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयास प्रथम पारितोषिक मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक वाहन चालकाने सजगतेने वाहन चालविल्यास अपघातांवर निश्चित नियंत्रण येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातही पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी कारवायांबरोबर वाहतूकीच्या नियमांची जनजागृती केल्यामुळेच राज्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला अपघाताचे उद्दीष्ट कमी करण्यात प्रथम पारितोषिक मिळाल्याचा दावा केला.यावेळी राजकुमार गुप्ता, प्रितम चव्हाण, राजाराम कसाळे, मनोहर वसानी, नितीन रोकडे, गिरीश पाटील, राजू पाटील, बाळासाहेब घुले आणि रुपसिंग पुरोहित आदी १८ नागरिकांचा वाहतूक नियमनामध्ये पोलिसांना विशेष मदत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या नेहा गुप्ता हिने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. नेहा हिच्यासह विविध स्पर्धांमधील पारितोषिक विजेत्यांचा आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, प्रवीण पवार, दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, प्रियंका नारनवरे, अविनाश अंबुरे, सुभाष बुरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, तुकाराम पवळे, सचिन गावडे आणि मनोहर आव्हाड आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होेते.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस