शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

कंत्राटदारांना ‘अमृत’चे वावडे, २७ गावांसाठी १६० कोटींची पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:33 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत १६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत १६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे करण्यासाठी महापालिकेने फेरनिविदा मागवूनही त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिस-यांदा निविदा मागवावी लागणार आहे.राज्य सरकारकडून ‘क’ व ‘ड’ वर्गासाठी अमृत योजना राबवली जाणार आहे. केडीएमसीचा समावेश ‘क’ वर्गात होते. या महापालिकांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. अमृत योजना १६० कोटी रुपयांची असली तरी सरकार ५० टक्के म्हणजे ८० कोटी रुपये दणार आहे. तर उर्वरित ८० कोटींचा निधी केडीएमसीला भरावा लागणार आहे. महापालिकेने त्यासाठी निविदा मागविल्या. पहिल्या प्रयत्नात महापालिकेच्या निविदेला एका कंत्राट कंपनीने प्रतिसाद दिला. मात्र, अन्य प्रतिस्पर्धी कंत्राटदार नसल्याने या निविदा प्रक्रियेचा उपयोग झाला नाही. त्यामुळे महापालिकेने फेरनिविदा मागविली आहे. त्यालाही कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे तिसºयांदा निविदा मागवावी लागणार आहे. त्यात एक जरी कंत्राट कंपनीची निविदा आल्यास या कंपनीचा विचार होऊ शकतो. विकासकामांपोटीची ४५ कोटींची बिले महापालिका कंत्राटादारांना देणे आहे. महापालिका अर्थिक अडचणीत असल्याने बिले मिळणार नाहीत, या भितीपोटी निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण सांगितले जात आहे.अमृत योजनेसाठी महापालिकेस ८० कोटी रुपये उभे करायचे आहेत. त्यासाठी महापालिकेने अथर्संकल्पात तरतूद केली आाहे का, याबाबत प्रशासन साशंक आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीतील ३०० कोटींची तूट भरून काढण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत कोणतीही नवीन कामे न घेण्याचा निर्णय आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. वसुलीचे लक्ष्य वाढवून ही तूट भरून काढली जाणार आहे. सरकारकडून अनुदान मिळावे. तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन ही तूट भरून काढण्याचे प्रयत्न केले जात आहे.महापालिका क्षेत्रात १३ महिने नव्या इमारतींच्या बांधकामास बंदी होती. त्यामुळे आर्थिक खड्डा पडला. त्यात २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली. या गावांचे अनुदान सरकारने दिलेले नाही. एलबीटी कराचे अनुदान सरकार दरबारी थकले आहे. महापालिका ‘क’ वर्गात आल्याने वित्तीय आयोगाचे पैसे देणे सरकारने बंद केले. सरकारने किमान एक वर्षाचे अनुदान तरी महापालिकेस द्यावे. सरकारने या सगळ््या थकबाकीच्या बदल्यात अमृत पाणीपुरवठा योजनेचा ८० कोटीचा हिस्सा महापालिकेच्या वतीने भरावा, अशी मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली आहे. मात्र, त्याला राज्य सरकारने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.महापालिका क्षेत्रात २७ गावे धरून ३४५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्याचे बील महापालिका एमआयडीसीकडे भरते. महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत १५० दशलक्ष लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली. यामुळे महापालिका पाणीपुरवठ्यात स्वयंपूर्ण झाली. मात्र, ही योजना राबविली तेव्हा २७ गावे महापालिकेत नव्हती. गावे जून २०१५ मध्ये महापालिकेत आली. या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजना आहे. तिच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली. पहिला टप्पा हा १६० कोटींचा आहे. पहिल्या टप्प्यात वितरण व्यवस्था सुधारली जाईल तर दुसºया टप्प्यात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे.गावे महापालिकेत आल्यानंतर सहा महिन्यानंतरच महापालिकेने अमृत योजना राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने महापालिकेच्या हिश्याच्या रक्कमेचे काय, असा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महापालिकेस योजना हवी आहे. मात्र अर्थिक कोंडीचे कारण सांगून हिश्याच्या रक्कमेचा भार सरकारच्या पारड्यात ढकलायचा आहे.>यंदाही उन्हाळ्यात टंचाईच्या झळा२७ गावांतील पाणीप्रश्न दोन वर्षे गाजत आहे. लोकप्रतिनिधीही नागरिकांना उत्तरे देऊन कंटाळले आहेत. मोर्चे व आंदोलन करून झाली आहेत. दरम्यान ३३ कोटी रुपये खर्चाच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला ‘स्थायी’ने मंजुरी दिली होती. या कामावरून राजकीय वादंग झाला.आता अमृत योजना मंजूर होऊन त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याने ३३ कोटी रुपये खर्चाचे जलवाहिनी टाकण्याचे काम आपोआपच रद्द झाले आहे. त्याची काही आवश्यकता नाही, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे. परंतु, निविदेला प्रतिसाद मिळत नाही. तिसºयांदा निविदा काढल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाल्यास कंत्राटदार नेमला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मात्र, त्याला विलंब लागणार असल्याने यंदाही उन्हाळ््यात गावांना टंचाईच्या झळा बसणार आहेत.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका