शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By नितीन पंडित | Updated: September 1, 2023 17:42 IST

भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचे सवंर्धन करण्याबरोबरच सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांवरून राज्य सरोवर संवर्धन विकास योजनेतून तलावांच्या विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे.यापूर्वीच भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्याच्या पर्यावरण विभागाकडून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन,प्रदूषण कमी करण्याबरोबर तलाव संवर्धन करण्यासाठी गावांमधील तलावांचा समावेश केला जातो.त्यानुसार तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच परिसरात झाडे लावणे, सोलार पथदिवे, बेंचेस, निर्माल्यकलश बसविण्यात येतात.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचा राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार कल्याण तालुक्यातील उतणे चिंचवली येथील उतणे तलावासाठी दोन कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव, मुरबाड तालुक्यातील तळवली-बारगाव तलावासाठी दोन कोटी ४४ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील धामणगाव तलावासाठी ३ कोटी ९७ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वडपे तलावासाठी ४ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वाशेरे तलावासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि भिवंडी तालुक्यातील कोनगावातील कोन तलावासाठी पाच कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

तसेच या तलावांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधीही तातडीने वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. या कामांबरोबरच बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव तलावासाठी दोन कोटी ३४ लाख, जुवेली गावासाठी दोन कोटी ८५ आणि कात्रप गावासाठी ४ कोटी ५३ यासाठी नगरपालिकेला १० कोटी निधी मंजूर केलेला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वऱ्हाळदेवी तलावासह आणखी सहा तलावांच्या संवर्धनासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBhiwandiभिवंडी