शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By नितीन पंडित | Updated: September 1, 2023 17:42 IST

भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचे सवंर्धन करण्याबरोबरच सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांवरून राज्य सरोवर संवर्धन विकास योजनेतून तलावांच्या विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे.यापूर्वीच भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्याच्या पर्यावरण विभागाकडून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन,प्रदूषण कमी करण्याबरोबर तलाव संवर्धन करण्यासाठी गावांमधील तलावांचा समावेश केला जातो.त्यानुसार तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच परिसरात झाडे लावणे, सोलार पथदिवे, बेंचेस, निर्माल्यकलश बसविण्यात येतात.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचा राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार कल्याण तालुक्यातील उतणे चिंचवली येथील उतणे तलावासाठी दोन कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव, मुरबाड तालुक्यातील तळवली-बारगाव तलावासाठी दोन कोटी ४४ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील धामणगाव तलावासाठी ३ कोटी ९७ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वडपे तलावासाठी ४ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वाशेरे तलावासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि भिवंडी तालुक्यातील कोनगावातील कोन तलावासाठी पाच कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

तसेच या तलावांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधीही तातडीने वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. या कामांबरोबरच बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव तलावासाठी दोन कोटी ३४ लाख, जुवेली गावासाठी दोन कोटी ८५ आणि कात्रप गावासाठी ४ कोटी ५३ यासाठी नगरपालिकेला १० कोटी निधी मंजूर केलेला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वऱ्हाळदेवी तलावासह आणखी सहा तलावांच्या संवर्धनासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBhiwandiभिवंडी