शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

जलवाहतुकीने सहा पालिका जोडा

By admin | Updated: January 2, 2017 03:46 IST

जिल्ह्यातील ६ महानगरपालिकांना खाडी किनारा लाभला आहे. याचा उपयोग करून जलवाहतूक तेथे लवकर सुरु अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे

ठाणे : जिल्ह्यातील ६ महानगरपालिकांना खाडी किनारा लाभला आहे. याचा उपयोग करून जलवाहतूक तेथे लवकर सुरु अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्याकडे केली आहे. ती सुरू झाल्यास वाहतूककोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होईल, तसेच ती नागरिकांच्या सोयीची ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. ठाणे जिल्ह्याला ३२ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला असून या खाडीतून जलवाहतुकीचा मार्ग उपलब्ध केल्यास ठाणे, नवी मुंबई , कल्याण-डोंबिवली, भिवंडी , मीरा-भार्इंदर तसेच वसई -विरार या महापालिका एकमेकास जोडल्या जातील. त्यामुळे होणारी वाहतूककोंडी व प्रदूषणास नक्कीच आळा बसेल. तसेच शहरातील नागरिकांना बोटीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेत पोहचता येऊ शकते. या जलवाहतुकीच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही तत्त्वता मान्यता मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजुरी देऊन जेटीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ठाणे शहराअंतर्गत कळवा खाडीतील खडक फोडून काढल्यास नवी मुंबई कडे जाणारा जलवाहतूक मार्ग सर्व नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)