शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची अधोगती; भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 19:15 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगती नव्हे तर अधोगती झाल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करून आता भाजपाने राज्याला एक क्रमांकाचे राज्य बनविल्याचा दावा त्यांनी माजी महापौर गीता जैन यांच्या भार्इंदर पश्चिमेकडील जैन देरासर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात केला.

भार्इंदर - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगती नव्हे तर अधोगती झाल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करून आता भाजपाने राज्याला एक क्रमांकाचे राज्य बनविल्याचा दावा त्यांनी माजी महापौर गीता जैन यांच्या भार्इंदर पश्चिमेकडील जैन देरासर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात केला.पुढे बोलताना त्यांनी भाजपा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून, देशाचे चित्र बदलत असल्याचे सांगितले. यापूर्वी भाजपा चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता, तो आता जनतेने साथ दिल्यामुळे एक क्रमांकाचा पक्ष राहिल्याचा दावा त्यांनी केला. देशातील १८ राज्ये तसेच सर्वात जास्त महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा भाजपाच्या ताब्यात असल्याची माहिती देत त्यात वाढ होत असल्याचा दावाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परदेशी गुंतवणूक वाढवून बेकारी हटविण्याचं काम करीत असल्याचे सांगून देशातील राज्यांपैकी सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचा दावा त्यांनी केला.पालिकेचा कारभार लोकाभिमुख व्हावा, यासाठी भाजपा सतत प्रयत्नशील असून, पालिकेत जनतेने भाजपाला २०१७ मधील निवडणुकीत दिलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. शहरातील तळागळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवावा, यासाठी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयासाठी जैन यांना धन्यवाद देत त्यांनी अशा जनसंपर्कासाठी इतरांनी देखील प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री राम शिंदे, आ. प्रशांत बम, आ. चैनसुख संचैती, आ. नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेता रोहिदास पाटील, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गौरव पोरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र पोरवाल यांनी केले. २०१७ मधील पालिका निवडणुकीवेळी भाजपातून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविका सुमन कोठारी, प्रतिभा तांगडे-पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ते पुन्हा स्वगृही परतल्याचे दिसून आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरraosaheb danveरावसाहेब दानवे