शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:48 IST

देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.

ठाणे - देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी प्रकाशाच्या मार्गातून भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले.राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी (कवाडे गट) आणि समाजवादी पार्टी या आघाडीच्या कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार सभेत ते बोलत होते. मध्यंतरी भारताने सहा बॉलमध्ये १८ रन बनवले. त्यावेळी शेवटच्या बॉलवर षटकार खेचून जसा भारताचा विजय झाला. त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांनी शेवटच्या बॉलवर नाही, तर एक बॉल राखून विजयी षटकार मारावा. जिल्ह्यातील आघाडीचे असलेले वैभव आपल्याच चुकांमुळे गेले आहे. त्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. आता, कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीतून आघाडीचा उमेदवार मुल्ला यांचा विजय हा भविष्यातील लोकसभेपाठोपाठ असलेल्या विधानसभेसाठी प्रकाशमार्ग ठरणार आहे.तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे जिल्ह्यात चारही खासदार निवडून येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.काँग्रेस इच्छुक होतीकोकण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष इच्छुक होता. त्यासाठी आपण प्रयत्न केले. पण, नजीब उभा राहत असल्याने आपण माघार घेतली, असे मत काँग्रेसचे ठामपा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवले.गद्दारांना धडा शिकवेल - जितेंद्र आव्हाड२०१९ मध्ये सत्तापरिवर्तन होईल. याचे चित्र आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत दिसत आहे. तसेच मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नसते. तसेच हे राज्य गद्दारांना धडा शिकवणारे आहे. गेल्या काही दिवसांत देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अंसतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच, मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा करून विकासाचा मुद्दा हे सरकार बाजूला करत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यशवंत हाप्पे, माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, महेंद्र पवार, असलम खान, माजी महापौर मनोहर साळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस