शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:48 IST

देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.

ठाणे - देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी प्रकाशाच्या मार्गातून भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले.राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी (कवाडे गट) आणि समाजवादी पार्टी या आघाडीच्या कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार सभेत ते बोलत होते. मध्यंतरी भारताने सहा बॉलमध्ये १८ रन बनवले. त्यावेळी शेवटच्या बॉलवर षटकार खेचून जसा भारताचा विजय झाला. त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांनी शेवटच्या बॉलवर नाही, तर एक बॉल राखून विजयी षटकार मारावा. जिल्ह्यातील आघाडीचे असलेले वैभव आपल्याच चुकांमुळे गेले आहे. त्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. आता, कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीतून आघाडीचा उमेदवार मुल्ला यांचा विजय हा भविष्यातील लोकसभेपाठोपाठ असलेल्या विधानसभेसाठी प्रकाशमार्ग ठरणार आहे.तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे जिल्ह्यात चारही खासदार निवडून येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.काँग्रेस इच्छुक होतीकोकण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष इच्छुक होता. त्यासाठी आपण प्रयत्न केले. पण, नजीब उभा राहत असल्याने आपण माघार घेतली, असे मत काँग्रेसचे ठामपा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवले.गद्दारांना धडा शिकवेल - जितेंद्र आव्हाड२०१९ मध्ये सत्तापरिवर्तन होईल. याचे चित्र आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत दिसत आहे. तसेच मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नसते. तसेच हे राज्य गद्दारांना धडा शिकवणारे आहे. गेल्या काही दिवसांत देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अंसतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच, मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा करून विकासाचा मुद्दा हे सरकार बाजूला करत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यशवंत हाप्पे, माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, महेंद्र पवार, असलम खान, माजी महापौर मनोहर साळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस