शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 05:51 IST

केंद्रातील भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे:  एखाद्याने टीका केली तर त्याच्या विरोधात व्यक्तिगत जाऊन कारवाई करणे हे लोकशाहीला न परवडणारे आणि भूषणावह नाही. केंद्रातील भाजपला आम्ही सल्ला देत आहोत की, या ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडावे. भाजप सरकारला  सत्तेचा माज आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दुसरीकडे नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना सरकार आणि संघटनेमध्ये फरक असल्याचे सांगून त्यांचा निर्णय घेण्यास किंवा उत्तरे देण्यास सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने ते बुधवारी ठाण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅलीही काढली. त्यामध्ये ते सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या मेळाव्याला पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडले जावेत, सोडविले जावेत, अशी अपेक्षा असते. 

मात्र, भाजपची गोंधळ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर तो त्यांचा भाग आहे.  मात्र, विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत, सरकार उत्तरे देण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप ही सर्वांत मोठी भ्रष्टाचार करणारी पार्टी देशात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर याचे परिणाम व्हावेत, यासाठी आर्यन खानवर बळजबरीने ड्रग्जचे गुन्हे दाखल केले होते. हा निवडणुकीसाठीचाच एक फंडा असल्याचा दावाही त्यांनी केला.

...तर ठाण्यात ओबीसी महापौर

ओबीसी आरक्षणाबाबत उद्या निकाल येणे अपेक्षित आहे. परंतु, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचाच महापौर व उपमहापौर येथे बसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसthaneठाणे