शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 05:51 IST

केंद्रातील भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे:  एखाद्याने टीका केली तर त्याच्या विरोधात व्यक्तिगत जाऊन कारवाई करणे हे लोकशाहीला न परवडणारे आणि भूषणावह नाही. केंद्रातील भाजपला आम्ही सल्ला देत आहोत की, या ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडावे. भाजप सरकारला  सत्तेचा माज आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दुसरीकडे नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना सरकार आणि संघटनेमध्ये फरक असल्याचे सांगून त्यांचा निर्णय घेण्यास किंवा उत्तरे देण्यास सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने ते बुधवारी ठाण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅलीही काढली. त्यामध्ये ते सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या मेळाव्याला पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडले जावेत, सोडविले जावेत, अशी अपेक्षा असते. 

मात्र, भाजपची गोंधळ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर तो त्यांचा भाग आहे.  मात्र, विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत, सरकार उत्तरे देण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप ही सर्वांत मोठी भ्रष्टाचार करणारी पार्टी देशात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर याचे परिणाम व्हावेत, यासाठी आर्यन खानवर बळजबरीने ड्रग्जचे गुन्हे दाखल केले होते. हा निवडणुकीसाठीचाच एक फंडा असल्याचा दावाही त्यांनी केला.

...तर ठाण्यात ओबीसी महापौर

ओबीसी आरक्षणाबाबत उद्या निकाल येणे अपेक्षित आहे. परंतु, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचाच महापौर व उपमहापौर येथे बसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसthaneठाणे