शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:56 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे.

- श्याम राऊतमुरबाड - भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी युती आणि आघाडी दोहोंनी कंबर कसली आहे. युतीच्या वाटणीत भिवंडीची जागा भाजपाच्या वाट्याला, तर आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपील पाटील हे भाजपाचे असून, यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघात २00९ साली काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे हे निवडून आले होते. २0१४ मध्ये टावरे यांना डावलून भाजपातून आलेले कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली गेली. विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कुणबी कार्ड खेळले. कारण या मतदारसंघात मुरबाड, शहापूर, भिवंडीचा ग्रामीण भाग आणि कल्याणच्या ग्रामीण भागात कुणबी समाज मोठा आहे. शिवाय शहापूर, मुरबाडमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.भिवंडी शहरातील मुस्लिम मतदार कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही, असा अंदाज बांधून विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली गेली. यावर उपाय म्हणून भाजपाने कपील पाटील यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे कुणबी विरु द्ध आगरी लढत होऊन विश्वनाथ पाटील जिंकतील, असा सर्वांचाच अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले. मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे व माजी आमदार गोटीरामभाऊ पवार हे विश्वनाथ पाटील यांच्यासोबत असतानाही, ज्या गावात राष्ट्रवादीशिवाय कुणालाच मतदान होत नव्हते, तेथेदेखील कपील पाटील यांना आघाडी मिळाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असलेल्या जवळीकीमुळे कपील पाटील यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार मतांची आघाडी मिळाली. हिच आघाडी कपील पाटील यांचा विजय तर विश्वनाथ पाटील यांचा पराभव करून गेली; मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली चूक सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीला मारक ठरून माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांना पराभव पत्करावा लागला. आता तशी परिस्थिती राहीली नाही. कपील पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली; मात्र पाटील यांच्याकडून त्यांना सहकार्य तर मिळालेच नाही, उलट मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादी संपवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळच्या निवडणुकीत त्याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माजी खासदार सुरेश टावरे आणि २0१४ च्या निवडणुकीत पराभूत झालेले विश्वनाथ पाटील हे देव पाण्यात बुडवून बसले आहेत; मात्र काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी एका बाहेरच्या उमेदवाराचे जिकरीचे प्रयत्न सुरू आहेत.उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय दिल्लीच्या दरबारात होणार आहे. काँग्रेसची उमेदवारी कुणालाही मिळाली, तरी त्या उमेदवाराची भिस्त राष्ट्रवादीवरच आवलंबून असणार आहे; कारण भिवंडी शहर वगळता उर्वरित मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नाममात्र आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक