शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे नसल्याने काँग्रेसने उमेदवारी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:33 IST

विश्वनाथ पाटील यांचा आरोप : शेतकऱ्यांच्या इच्छेखातर मी अपक्ष म्हणून अर्ज भरला

भिवंडी : निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, या कारणास्तव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी दिली नसल्याचा आरोप काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी केला.

मी शेतकरी आहे. माझ्याकडे किती पैसे असू शकतात? २०१४ साली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली. तेव्हा पैशांचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. मग, आता पैशांचा मुद्दा का कुणी उपस्थित केला? ही पक्ष चालवण्याची पद्धत नाही. पाणी, रोजगार, सिंचन, शेती यासाठी मी गेली अनेक वर्षे लढत आहे. २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी मला ८९ हजार मते मिळाली.

२०१४ साली काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. तेव्हा मला तीन लाख मते मिळाली. मोदीलाट असतानाही तीन लाख मते मिळाली, ही थोडीथोडकी मते नव्हती. कोकणपट्ट्यात कुणबी समाजाचे ६५ टक्के मतदार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या ४० टक्के आहे. मी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदावर काम केले. राणे यांनी काँग्रेस सोडली, तेव्हा रत्नागिरीत मला स्टार प्रचारक म्हणून पाठवले होते. मला उमेदवारी द्यायची नव्हती, तर पाच महिन्यांआधीच ही बाब पक्षाने स्पष्ट करायला हवी होती. आता ऐनवेळी सगळी संभ्रमावस्था निर्माण करून उमेदवारी नाकारली आहे. कुणबीसेना आणि शेतकऱ्यांच्या इच्छेखातर मी पुन्हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काँग्रेसशी मी गद्दारी केली अथवा बंडखोरी केली, असे म्हणता येत नाही.

भाजपच्या सांगण्यावरून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या आरोपावर पाटील म्हणाले की, या भागातील प्रश्नांविषयी चर्चा करण्याकरिता मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. त्यादिवशी त्यांची माझी भेट झाली. त्यांनी माझे काही प्रश्न सोडवण्याचे मान्य केले आहे. याचा अर्थ माझ्या उमेदवारीमागे भाजप आहे, असा होत नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.संभ्रम निर्माण करण्यामागे भाजपचा हात - टावरेटावरे यांना मंगळवारी काँग्रेसने ए, बी फॉर्म दिले. त्यासाठी ते प्रदेश कार्यालयात रात्रीपासून ठाण मांडून बसले होते. तिकडे बाळ्यामामांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली होती. हा नेमका काय प्रकार आहे, अशी विचारणा केली असता टावरे यांनी सांगितले की, मुकुल वासनिक यांच्या सहीनिशी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझे नाव होते.मला उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. कोण प्रयत्नशील होते, त्याचे काय झाले, हे आता उघड झाले आहे. ए,बी फॉर्म मला दिला जाणार नाही, अशी अफवा पसरवली गेली होती. यामागे भाजपचे राजकारण होते. पराभवाची भीती वाटू लागल्याने त्यांनी अपप्रचार करून काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप टावरे यांनी केला.विश्वनाथ पाटील यांच्या बंडखोरीविषयी टावरे म्हणाले की, २००९ साली मी लोकसभा निवडणुकीत विजयी झालो असतानाही २०१४ मध्ये माझ्याऐवजी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, मी अवाक्षरही काढले नाही. विद्यमान खासदाराएवजी त्यांना उमेदवारी दिली, यापेक्षा पक्षाने त्यांना काय द्यावे, असा प्रश्न टावरेंनी केला.निवडणुकीसाठी पैसे नाहीत, म्हणून पक्षाने उमेदवारी नाकारली, हा पाटील यांचा दावा हास्यास्पद आहे. मागच्यावेळी त्यांच्याकडे पैसे होते व आता ते संपले, असे काही आहे का? आपण काय बोलतो, याचा संदर्भ तरी नीट लागला पाहिजे, असा सल्ला टावरे यांनी दिला.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी