शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

पैसे नसल्याने काँग्रेसने उमेदवारी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:33 IST

विश्वनाथ पाटील यांचा आरोप : शेतकऱ्यांच्या इच्छेखातर मी अपक्ष म्हणून अर्ज भरला

भिवंडी : निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, या कारणास्तव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी दिली नसल्याचा आरोप काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी केला.

मी शेतकरी आहे. माझ्याकडे किती पैसे असू शकतात? २०१४ साली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली. तेव्हा पैशांचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. मग, आता पैशांचा मुद्दा का कुणी उपस्थित केला? ही पक्ष चालवण्याची पद्धत नाही. पाणी, रोजगार, सिंचन, शेती यासाठी मी गेली अनेक वर्षे लढत आहे. २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी मला ८९ हजार मते मिळाली.

२०१४ साली काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. तेव्हा मला तीन लाख मते मिळाली. मोदीलाट असतानाही तीन लाख मते मिळाली, ही थोडीथोडकी मते नव्हती. कोकणपट्ट्यात कुणबी समाजाचे ६५ टक्के मतदार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या ४० टक्के आहे. मी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदावर काम केले. राणे यांनी काँग्रेस सोडली, तेव्हा रत्नागिरीत मला स्टार प्रचारक म्हणून पाठवले होते. मला उमेदवारी द्यायची नव्हती, तर पाच महिन्यांआधीच ही बाब पक्षाने स्पष्ट करायला हवी होती. आता ऐनवेळी सगळी संभ्रमावस्था निर्माण करून उमेदवारी नाकारली आहे. कुणबीसेना आणि शेतकऱ्यांच्या इच्छेखातर मी पुन्हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काँग्रेसशी मी गद्दारी केली अथवा बंडखोरी केली, असे म्हणता येत नाही.

भाजपच्या सांगण्यावरून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या आरोपावर पाटील म्हणाले की, या भागातील प्रश्नांविषयी चर्चा करण्याकरिता मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. त्यादिवशी त्यांची माझी भेट झाली. त्यांनी माझे काही प्रश्न सोडवण्याचे मान्य केले आहे. याचा अर्थ माझ्या उमेदवारीमागे भाजप आहे, असा होत नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.संभ्रम निर्माण करण्यामागे भाजपचा हात - टावरेटावरे यांना मंगळवारी काँग्रेसने ए, बी फॉर्म दिले. त्यासाठी ते प्रदेश कार्यालयात रात्रीपासून ठाण मांडून बसले होते. तिकडे बाळ्यामामांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली होती. हा नेमका काय प्रकार आहे, अशी विचारणा केली असता टावरे यांनी सांगितले की, मुकुल वासनिक यांच्या सहीनिशी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझे नाव होते.मला उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. कोण प्रयत्नशील होते, त्याचे काय झाले, हे आता उघड झाले आहे. ए,बी फॉर्म मला दिला जाणार नाही, अशी अफवा पसरवली गेली होती. यामागे भाजपचे राजकारण होते. पराभवाची भीती वाटू लागल्याने त्यांनी अपप्रचार करून काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप टावरे यांनी केला.विश्वनाथ पाटील यांच्या बंडखोरीविषयी टावरे म्हणाले की, २००९ साली मी लोकसभा निवडणुकीत विजयी झालो असतानाही २०१४ मध्ये माझ्याऐवजी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, मी अवाक्षरही काढले नाही. विद्यमान खासदाराएवजी त्यांना उमेदवारी दिली, यापेक्षा पक्षाने त्यांना काय द्यावे, असा प्रश्न टावरेंनी केला.निवडणुकीसाठी पैसे नाहीत, म्हणून पक्षाने उमेदवारी नाकारली, हा पाटील यांचा दावा हास्यास्पद आहे. मागच्यावेळी त्यांच्याकडे पैसे होते व आता ते संपले, असे काही आहे का? आपण काय बोलतो, याचा संदर्भ तरी नीट लागला पाहिजे, असा सल्ला टावरे यांनी दिला.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी