शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मल:निसारण प्रक्रिया केंद्र बंद प्रकरणी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

By धीरज परब | Updated: November 29, 2022 14:14 IST

पालिका अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात असल्याने अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे.

- धीरज परब मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने तब्बल ७०० कोटीं पेक्षा जास्त खर्चून केलेल्या भूमिगत गटार योजनेतील केवळ दोन मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प ५० टक्के क्षमतेनेच सुरु असून बाकी केंद्र बंद वा अपूर्ण आहेत. पालिका अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात असल्याने अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मीरा-भाईंदरकाँग्रेस तर्फे सातत्याने महापालिकेच्या मलनिःस्सारण केंद्राच्या घोटाळ्यांच्या पुराव्यांसह तक्रारी केल्या आहेत . पालिका व एमपीसीबी च्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा दोन्ही विभागाचे अधिकारी नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी खेळ करत आहेत . मलमूत्राचे घातक सांडपाणी हे प्रक्रिया न करताच थेट खाडी , समुद्रात व कांदळवन क्षेत्रात तसेच नाल्यात सोडले जात आहे .  एमपीसीबी प्रदूषण व पर्यावरचा नाश करू देत असताना दुसरीकडे तक्रारी नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारांसह मलनिःस्सारण केंद्रांची पाहणी केली.

जैसल पार्क आणि सृष्टी येथील मल:निसारण प्रक्रिया केंद्र पूर्णतः बंद तर नाझरथ चर्च, खारीगाव येथील केंद्रे अपूर्ण बांधकाम व अपुऱ्या यंत्रसामुग्री मुळे बंद आहेत. सृष्टि म्हाडा येथील केंद्र  रहिवाशी्यांच्या विरोधा मुळे बंद आहेत तर शांतिपार्क, नयानगर येथील केंद्रे क्षमतेच्या निम्म्या क्षमतेने  सुरु आहेत. उर्वरित ४ मलनिःस्सारण केंद्र प्रक्रियेविना दिखाव्यासाठी कार्यरत ठेवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पाहणी नंतर जिल्हाध्यक्ष सामंत यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या नंतरही त्यांनी कारवाई केली नाही.  पालिकेचे संबंधित विद्यमान आणि तत्कालीन अधिकारी तसेच एमपीसीबीचे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने करोडोंचा खर्च केला गेला .  नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकून खाडी - समुद्र मधील पाणी प्रदूषित केले , पर्यावरचा नाश केला , मासे आदी जलजीव नष्ट केले असल्याने ह्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी  सामंत ह्यांनी केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcongressकाँग्रेस