शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्‍थानी – सुधांशु त्रिवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 22:53 IST

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे.

ठाणे:अब्‍दुल कलाम, बिस्मिल्‍ला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान, रसखान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय त्‍यांना याकुब मेमन, अफजल गुरु आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथ्‍थीच्‍या विचाराला बळ देऊन पहिले देश तोडणारी व आता देशात तोडफोड करणारी काँग्रेसची शेरोशायरी देखील आता पाकीस्‍थानी झाली असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी येथे केली. रामभाऊ म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे प्रथम पुष्‍प गुंफतांना ते बोलत होते.

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे त्‍यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्‍यांचा विकास झाला. मात्र कॉंग्रेसने मतांच्‍या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्‍वातंत्र्यपुर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेला मुस्‍लीम समाजाला कॉंग्रेसने सतत भीतीच्‍या सावटाखाली ठेवले. त्‍यांना मदरस्‍यात टाकले, स्‍वतंत्र कायदा करून त्‍यांना देशात मिसळू दिले नाही, फतव्‍यात अडकवले. मुस्‍लीमांमधील कलाम, बिस्मिला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान यांना हिरो करू दिले नाही तर मुस्‍लीम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्‍या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले.

मतांसाठी असे देश तोडत राहिले आणि आता संपुर्ण देशात तोडफोड करीत आहेत. नागरिकता कायदा हा मुळ काँग्रेसने आणलेला, काँग्रेसच्‍या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्‍यमंत्र्यांनी आणि ग्रेस समितीने आग्रह धरलेल्‍या या कायदयाला मोदी सरकार प्रत्‍यक्षात उतरवत असतांना देखील केवळ सत्‍तेपासुन वंचित काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे हे स्‍पष्‍ट दिसत असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी केली.

देशात कोण शरणार्थी आणि कोण खुसखोर आहेत हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत राष्‍ट्रनिती म्‍हणून सीएएची अंमलबजावणी होणार असा विश्‍वास त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केला. ज्‍यांना कालपर्यंत परराज्‍यातील भारतीय देखील नको होते ते सत्‍तेच्‍या मोहापायी परराष्‍ट्रातील घुसखोरांची तळी उचलत आहेत असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टिका केली. एनआरसी अजुन आला नसला तरी जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल असे म्‍हणून काही लोक उर बडवत आहेत असाही टोला त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात लगावला.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भाजपा राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष विनय सहस्‍त्रबुध्‍दे होते. यावेळी म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे अध्‍यक्ष आमदार संजय केळकर व सचिव शरद पुरोहित व्‍यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई