शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्‍थानी – सुधांशु त्रिवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 22:53 IST

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे.

ठाणे:अब्‍दुल कलाम, बिस्मिल्‍ला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान, रसखान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय त्‍यांना याकुब मेमन, अफजल गुरु आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथ्‍थीच्‍या विचाराला बळ देऊन पहिले देश तोडणारी व आता देशात तोडफोड करणारी काँग्रेसची शेरोशायरी देखील आता पाकीस्‍थानी झाली असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी येथे केली. रामभाऊ म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे प्रथम पुष्‍प गुंफतांना ते बोलत होते.

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे त्‍यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्‍यांचा विकास झाला. मात्र कॉंग्रेसने मतांच्‍या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्‍वातंत्र्यपुर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेला मुस्‍लीम समाजाला कॉंग्रेसने सतत भीतीच्‍या सावटाखाली ठेवले. त्‍यांना मदरस्‍यात टाकले, स्‍वतंत्र कायदा करून त्‍यांना देशात मिसळू दिले नाही, फतव्‍यात अडकवले. मुस्‍लीमांमधील कलाम, बिस्मिला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान यांना हिरो करू दिले नाही तर मुस्‍लीम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्‍या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले.

मतांसाठी असे देश तोडत राहिले आणि आता संपुर्ण देशात तोडफोड करीत आहेत. नागरिकता कायदा हा मुळ काँग्रेसने आणलेला, काँग्रेसच्‍या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्‍यमंत्र्यांनी आणि ग्रेस समितीने आग्रह धरलेल्‍या या कायदयाला मोदी सरकार प्रत्‍यक्षात उतरवत असतांना देखील केवळ सत्‍तेपासुन वंचित काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे हे स्‍पष्‍ट दिसत असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी केली.

देशात कोण शरणार्थी आणि कोण खुसखोर आहेत हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत राष्‍ट्रनिती म्‍हणून सीएएची अंमलबजावणी होणार असा विश्‍वास त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केला. ज्‍यांना कालपर्यंत परराज्‍यातील भारतीय देखील नको होते ते सत्‍तेच्‍या मोहापायी परराष्‍ट्रातील घुसखोरांची तळी उचलत आहेत असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टिका केली. एनआरसी अजुन आला नसला तरी जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल असे म्‍हणून काही लोक उर बडवत आहेत असाही टोला त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात लगावला.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भाजपा राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष विनय सहस्‍त्रबुध्‍दे होते. यावेळी म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे अध्‍यक्ष आमदार संजय केळकर व सचिव शरद पुरोहित व्‍यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई