शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्‍थानी – सुधांशु त्रिवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 22:53 IST

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे.

ठाणे:अब्‍दुल कलाम, बिस्मिल्‍ला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान, रसखान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय त्‍यांना याकुब मेमन, अफजल गुरु आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथ्‍थीच्‍या विचाराला बळ देऊन पहिले देश तोडणारी व आता देशात तोडफोड करणारी काँग्रेसची शेरोशायरी देखील आता पाकीस्‍थानी झाली असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी येथे केली. रामभाऊ म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे प्रथम पुष्‍प गुंफतांना ते बोलत होते.

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे त्‍यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्‍यांचा विकास झाला. मात्र कॉंग्रेसने मतांच्‍या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्‍वातंत्र्यपुर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेला मुस्‍लीम समाजाला कॉंग्रेसने सतत भीतीच्‍या सावटाखाली ठेवले. त्‍यांना मदरस्‍यात टाकले, स्‍वतंत्र कायदा करून त्‍यांना देशात मिसळू दिले नाही, फतव्‍यात अडकवले. मुस्‍लीमांमधील कलाम, बिस्मिला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान यांना हिरो करू दिले नाही तर मुस्‍लीम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्‍या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले.

मतांसाठी असे देश तोडत राहिले आणि आता संपुर्ण देशात तोडफोड करीत आहेत. नागरिकता कायदा हा मुळ काँग्रेसने आणलेला, काँग्रेसच्‍या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्‍यमंत्र्यांनी आणि ग्रेस समितीने आग्रह धरलेल्‍या या कायदयाला मोदी सरकार प्रत्‍यक्षात उतरवत असतांना देखील केवळ सत्‍तेपासुन वंचित काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे हे स्‍पष्‍ट दिसत असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी केली.

देशात कोण शरणार्थी आणि कोण खुसखोर आहेत हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत राष्‍ट्रनिती म्‍हणून सीएएची अंमलबजावणी होणार असा विश्‍वास त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केला. ज्‍यांना कालपर्यंत परराज्‍यातील भारतीय देखील नको होते ते सत्‍तेच्‍या मोहापायी परराष्‍ट्रातील घुसखोरांची तळी उचलत आहेत असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टिका केली. एनआरसी अजुन आला नसला तरी जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल असे म्‍हणून काही लोक उर बडवत आहेत असाही टोला त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात लगावला.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भाजपा राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष विनय सहस्‍त्रबुध्‍दे होते. यावेळी म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे अध्‍यक्ष आमदार संजय केळकर व सचिव शरद पुरोहित व्‍यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई