शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्‍थानी – सुधांशु त्रिवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 22:53 IST

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे.

ठाणे:अब्‍दुल कलाम, बिस्मिल्‍ला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान, रसखान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय त्‍यांना याकुब मेमन, अफजल गुरु आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथ्‍थीच्‍या विचाराला बळ देऊन पहिले देश तोडणारी व आता देशात तोडफोड करणारी काँग्रेसची शेरोशायरी देखील आता पाकीस्‍थानी झाली असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी येथे केली. रामभाऊ म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे प्रथम पुष्‍प गुंफतांना ते बोलत होते.

धर्माच्‍या नावावर जो देश जन्‍माला आला त्‍याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे त्‍यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्‍यांचा विकास झाला. मात्र कॉंग्रेसने मतांच्‍या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्‍वातंत्र्यपुर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेला मुस्‍लीम समाजाला कॉंग्रेसने सतत भीतीच्‍या सावटाखाली ठेवले. त्‍यांना मदरस्‍यात टाकले, स्‍वतंत्र कायदा करून त्‍यांना देशात मिसळू दिले नाही, फतव्‍यात अडकवले. मुस्‍लीमांमधील कलाम, बिस्मिला खान, ब्रिगेडीअर उस्‍मान यांना हिरो करू दिले नाही तर मुस्‍लीम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्‍या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले.

मतांसाठी असे देश तोडत राहिले आणि आता संपुर्ण देशात तोडफोड करीत आहेत. नागरिकता कायदा हा मुळ काँग्रेसने आणलेला, काँग्रेसच्‍या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्‍यमंत्र्यांनी आणि ग्रेस समितीने आग्रह धरलेल्‍या या कायदयाला मोदी सरकार प्रत्‍यक्षात उतरवत असतांना देखील केवळ सत्‍तेपासुन वंचित काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे हे स्‍पष्‍ट दिसत असल्‍याची टिका भाजपा राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांनी केली.

देशात कोण शरणार्थी आणि कोण खुसखोर आहेत हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत राष्‍ट्रनिती म्‍हणून सीएएची अंमलबजावणी होणार असा विश्‍वास त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केला. ज्‍यांना कालपर्यंत परराज्‍यातील भारतीय देखील नको होते ते सत्‍तेच्‍या मोहापायी परराष्‍ट्रातील घुसखोरांची तळी उचलत आहेत असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टिका केली. एनआरसी अजुन आला नसला तरी जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल असे म्‍हणून काही लोक उर बडवत आहेत असाही टोला त्रिवेदी यांनी आपल्‍या भाषणात लगावला.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भाजपा राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष विनय सहस्‍त्रबुध्‍दे होते. यावेळी म्‍हाळगी व्‍याख्‍यानमालेचे अध्‍यक्ष आमदार संजय केळकर व सचिव शरद पुरोहित व्‍यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई