शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

देशाला अडचणीत आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न- सुधांशू त्रिवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:32 IST

नागरिकता सुधारणा कायदा हा मूळ काँग्रेसने आणलेला आहे.

ठाणे : नागरिकता सुधारणा कायदा हा मूळ काँग्रेसने आणलेला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी आणि काँग्रेस समितीने आग्रह धरलेल्या या कायद्याला मोदी सरकार प्रत्यक्षात उतरवत असतानादेखील केवळ सत्तेपासून वंचित असलेल्या काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे, हे स्पष्ट दिसत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी केली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.नागरिकता सुधारणा कायद्यावर मत मांडताना सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले की, धर्माच्या नावावर जो देश जन्माला आला, त्याचे धर्मबांधवांनीच दोन तुकडे केले. मात्र, भारत असा देश आहे, त्यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्यांचा विकास झाला. मात्र, काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या मुस्लिम समाजाला काँग्रेसने सतत भीतीच्या सावटाखाली ठेवले. त्यांना मदरशात टाकले. स्वतंत्र कायदा करून त्यांना देशात मिसळू दिले नाही. फतव्यात अडकवले. मुस्लिमांमधील कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडिअर उस्मान यांना हीरो करू दिले नाही, तर मुस्लिम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले. मतांसाठी देश तोडत राहिले आणि आता संपूर्ण देशात तोडफोड करीत आहेत. देशात कोण शरणार्थी आणि कोण घुसखोर आहेत, हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रनीती म्हणून नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणारच, असा विश्वास त्रिवेदी यांनी व्यक्त केला.ज्यांना कालपर्यंत परराज्यांतील भारतीयदेखील नको होते, ते सत्तेच्या मोहापायी घुसखोरांची तळी उचलत आहेत, असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टीका केली. एनआरसी अद्याप आला नसला तरी, जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल, असे म्हणून काही लोक ऊर बडवत असल्याचा टोला त्रिवेदी यांनी लगावला.हा कायदा देशाला नवीन आयाम देणारा ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे होते. यावेळी म्हाळगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते.>शेरोशायरीही पाकिस्तानीअब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडिअर उस्मान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय. त्यांना याकुब मेमन, अफजल गुरू आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथींच्या विचाराला बळ देऊन आधी देश तोडणाऱ्या आणि आता देशात तोडफोड करणाºया काँग्रेसची शेरोशायरीदेखील आता पाकिस्तानी झाली असल्याची टीका सुधांशू त्रिवेदी यांनी या वेळी केली.