शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मीरा भाईंदर महापालिकेत रुग्णालय व मलनिस्सारण केंद्रां प्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 19:18 IST

मीरा भाईंदर महापालिकेत भूमिगत गटार योजना व मलनिस्सरण केंद्रातील गैरप्रकार तसेच रुग्णालयात वैद्यकीय सुविधा नसताना बांधकामावर करोडोंचा खर्च

मीरारोड - 

मीरा भाईंदर महापालिकेत भूमिगत गटार योजना व मलनिस्सरण केंद्रातील गैरप्रकार तसेच रुग्णालयात वैद्यकीय सुविधा नसताना बांधकामावर करोडोंचा खर्च प्रकरणी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत अचानक घोषणाबाजी करत महापालिका व सत्ताधारी विरुद्ध हल्लाबोल मोर्चाकाढण्यात आला. 

महापालिका मुख्यालयात सोमवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अनिल सावंत व  अशरफ शेख, नगरसेविका रुबीना फिरोज व  गीता परदेशी सह युवक काँग्रेसचे दीप काकडे, सिद्धेश राणे, कुणाल काटकर, मुकुल त्यागी आदींसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्यालयात आयुक्तांसह अनेक अधिकारी दालनात जाऊन घोषणा दिल्या. 

भूमिगत गटार योजनेसाठी ५०० कोटींचा खर्च करून सुद्धा अजून योजना पूर्ण झालेली नाही. नागरिकांकडून वर्षाला सुमारे ५ कोटींचा कर वसूल केला जात आहे. त्यातच मलनिस्सारण केंद्र पूर्ण क्षमेतेने चालत नसताना महापालिका महिन्याला त्यासाठी ७२ लाखांचा खर्च करत आहे. काही केंद्र तर बंद आहेत. प्रत्यक्षात सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जात असून पर्यावरणाचा व जनतेच्या पैश्यांचा चुराडा महापालिका व सत्ताधारी भाजपाने चालवल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सामंत यांनी यावेळी केला. 

मीरारोड मधील काँग्रेस काळात बांधलेले गेलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आवश्यक तपासणी यंत्र व सोयी सुविधा देण्यास पैसा नाही परंतु वाढीव बांधकामावर तब्बल ११ कोटींची उधळपट्टी पालिका व सत्ताधारी यांनी चालवल्याचे सामंत म्हणाले. 

शिष्टमंडळाने या दोन्ही विषयांवर शहर अभियंता दीपक खांबित व अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक