शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:56 IST

घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले.

ठाणे : घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. घोडबंदरच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात पाणीवितरणातील अनियमिततेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र खडताळे यांनी दिली.घोडबंदर भागातील वाढत्या बांधकामांवर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने बंदी लागू केली आणि ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले. परंतु, घोडबंदरसह संपूर्ण ठाणे शहराला २०४० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने सादर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने घोडबंदरची बांधकामबंदी उठवली.शुक्रवारच्या महासभेत पालिकेचा दावा अक्षरश: फोल ठरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी वागळे पट्ट्यासह लोकमान्यनगर भागात मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असल्याचे सांगितले. ही समस्या सुटावी, म्हणून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, आजही या भागाची पाण्याची समस्या का सुटली नाही, असा सवाल उपस्थित केला. नजीब मुल्ला म्हणाले की, शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्या व प्रतिमाणशी पाणी देण्याचे मापदंड यांचा विचार करता उपलब्ध पाणी तब्बल २२ टक्के अधिक आहे. असे असतानाही ठाण्याला पाण्यासाठी वणवण का करावी लागते, असा सवाल त्यांनी केला. अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणीपुरवठा अनियमित असून पूर्वी एक तास येणारे पाणी आता अवघे १० मिनिटेच येत असल्याचे निदर्शनास आणले. मुंब्रा येथे पाण्याची समस्या तीव्र असल्याची बाब नगरसेवक शानू पठाण यांनी निदर्शनास आणली. अशोक वैती यांनी त्यांच्या परिसरातील नागरिक तब्बल ४२ वर्षे शुद्ध न केलेले (रॉ वॉटर) पाणी पित असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु, अद्यापही योग्य ती कार्यवाही का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भरत चव्हाण, अनिता गौरी, मालती पाटील, संजय भोईर, शैलेश पाटील आदी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला पाण्याच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेWaterपाणी