शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:56 IST

घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले.

ठाणे : घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. घोडबंदरच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात पाणीवितरणातील अनियमिततेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र खडताळे यांनी दिली.घोडबंदर भागातील वाढत्या बांधकामांवर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने बंदी लागू केली आणि ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले. परंतु, घोडबंदरसह संपूर्ण ठाणे शहराला २०४० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने सादर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने घोडबंदरची बांधकामबंदी उठवली.शुक्रवारच्या महासभेत पालिकेचा दावा अक्षरश: फोल ठरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी वागळे पट्ट्यासह लोकमान्यनगर भागात मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असल्याचे सांगितले. ही समस्या सुटावी, म्हणून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, आजही या भागाची पाण्याची समस्या का सुटली नाही, असा सवाल उपस्थित केला. नजीब मुल्ला म्हणाले की, शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्या व प्रतिमाणशी पाणी देण्याचे मापदंड यांचा विचार करता उपलब्ध पाणी तब्बल २२ टक्के अधिक आहे. असे असतानाही ठाण्याला पाण्यासाठी वणवण का करावी लागते, असा सवाल त्यांनी केला. अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणीपुरवठा अनियमित असून पूर्वी एक तास येणारे पाणी आता अवघे १० मिनिटेच येत असल्याचे निदर्शनास आणले. मुंब्रा येथे पाण्याची समस्या तीव्र असल्याची बाब नगरसेवक शानू पठाण यांनी निदर्शनास आणली. अशोक वैती यांनी त्यांच्या परिसरातील नागरिक तब्बल ४२ वर्षे शुद्ध न केलेले (रॉ वॉटर) पाणी पित असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु, अद्यापही योग्य ती कार्यवाही का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भरत चव्हाण, अनिता गौरी, मालती पाटील, संजय भोईर, शैलेश पाटील आदी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला पाण्याच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेWaterपाणी