शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:56 IST

घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले.

ठाणे : घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. घोडबंदरच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात पाणीवितरणातील अनियमिततेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र खडताळे यांनी दिली.घोडबंदर भागातील वाढत्या बांधकामांवर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने बंदी लागू केली आणि ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले. परंतु, घोडबंदरसह संपूर्ण ठाणे शहराला २०४० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने सादर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने घोडबंदरची बांधकामबंदी उठवली.शुक्रवारच्या महासभेत पालिकेचा दावा अक्षरश: फोल ठरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी वागळे पट्ट्यासह लोकमान्यनगर भागात मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असल्याचे सांगितले. ही समस्या सुटावी, म्हणून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, आजही या भागाची पाण्याची समस्या का सुटली नाही, असा सवाल उपस्थित केला. नजीब मुल्ला म्हणाले की, शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्या व प्रतिमाणशी पाणी देण्याचे मापदंड यांचा विचार करता उपलब्ध पाणी तब्बल २२ टक्के अधिक आहे. असे असतानाही ठाण्याला पाण्यासाठी वणवण का करावी लागते, असा सवाल त्यांनी केला. अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणीपुरवठा अनियमित असून पूर्वी एक तास येणारे पाणी आता अवघे १० मिनिटेच येत असल्याचे निदर्शनास आणले. मुंब्रा येथे पाण्याची समस्या तीव्र असल्याची बाब नगरसेवक शानू पठाण यांनी निदर्शनास आणली. अशोक वैती यांनी त्यांच्या परिसरातील नागरिक तब्बल ४२ वर्षे शुद्ध न केलेले (रॉ वॉटर) पाणी पित असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु, अद्यापही योग्य ती कार्यवाही का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भरत चव्हाण, अनिता गौरी, मालती पाटील, संजय भोईर, शैलेश पाटील आदी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला पाण्याच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेWaterपाणी