शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

दुर्गाडी पुलाचे काम कासवगतीने, एमएमआरडीएकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:21 AM

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे.

कल्याण - कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे.कल्याण-भिवंडीला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पूल हा वाहतुकीसाठी बंद आहे. त्याला लागूनच समांतर खाडीपूल बांधला गेला. मात्र, तो वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने पुलावर प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या पुलाशेजारीच नवीन सहापदरी पूल उभारण्यास एमएमआरडीएने मंजुरी दिली. ७६ कोटी रुपयांचे हे काम सुप्रीम कंपनीला देण्यात आले. २५ मीटर रुंद आणि ३८ मीटर लांब असलेल्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबरला झाले. पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात कामाला अद्याप गती मिळालेली नाही. पुलाचे केवळ दोन ते तीन खांब खाडीत उभारले गेले आहेत. पुलाचे काम सुरू झाले, तेव्हा मेरीटाइम बोर्डाने पुलाचे आधारखांब खाडीत उभारण्यासाठी परवानगीचा मुद्दा उपस्थित केला होता. या परवानगीनंतर सुप्रीम कंपनीने कामाला सुरुवात केली. मात्र, काम संथगतीने सुरू आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास पुलाच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागतील, अशी शक्यता आहे.पुलाच्या संथगतीबद्दल शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी कंत्राटदाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या कंपनीला एमएमआरडीएने भिवंडीतील अन्य दोन उड्डाणपुलांचे काम दिलेले आहे. तेही संथगतीने सुरू असल्याची तेथील लोकप्रतिनिधींची ओरड आहे.चौकातील कोंडी फोडापत्रीपूल ते दुर्गाडीदरम्यान गोविंदवाडी बायपास रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या मार्गाने येणारी वाहने दुर्गाडी चौकाला वळसा घालून खाडीपुलाकडे अथवा शहाड व कल्याण स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यामुळे दुर्गाडी चौकात कोंडी होती. ती टाळण्यासाठी बायपास रस्त्यावरून आलेली वाहने थेट कोनगावात जाण्यासाठी एक मार्ग तयार करावा.त्याचबरोबर स्टेशन ते दुर्गाडी असा एलिव्हेटेड मार्ग करावा. त्यामुळे कल्याण शिवाजी चौक आणि सहजानंद चौकातील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी पाटील यांनी मदान यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या