शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:43 AM

ठाणे : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा ...

ठाणे : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. वर्षातून किमान दोनवेळा वृक्षांच्या फांद्यांची छाटणी आवश्यक असताना, वृक्ष प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मासुंदा तलावाजवळ बुधवारी रात्री कोसळलेल्या वृक्षाखाली सापडून रिक्षाचालक अरविंद राजभर (वय २८, रा. रामनगर, वागळे इस्टेट व प्रवासी चंद्रकांत केशव पाटील (वय ५७, रा. रबाळे, नवी मुंबई) यांचा मृत्यू झाला. शहरातील बहुसंख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाल्यामुळे झाडांच्या मुळांना पसरण्यास जागा राहत नाही, असा खुलासा केला जातो. त्यामुळे अशा वृक्षांचे वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यानंतर धोकादायक, महाकाय वृक्ष व धोकादायक वृक्षांच्या फांद्या वेळोवेळी कापण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे वृक्ष प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच मासुंदा तलावाजवळची दुर्घटना घडली, असा आरोप त्यांनी केला.

या दुर्घटनेला सर्वस्वी महापालिका व वृक्ष प्राधिकरण जबाबदार आहे. या दुर्घटनेत दोघांचा बळी गेल्यामुळे दोन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेने स्वीकारून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकट

दोन दुर्घटनानंतरही

झोपी गेलेले वृक्ष प्राधिकरण!

ठाण्यात यापूर्वी वृक्ष कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये पाचपाखाडीत वकील किशोर पवार यांचा झाडाखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला सहानुभूती म्हणून महापालिकेने नोकरी दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये ठाणे स्टेशनजवळ ताडाचे झाड कोसळल्यामुळे दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतरही वृक्ष प्राधिकरण झोपी गेलेले आहे. त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचा धोका आहे, असा आरोप वाघुले यांनी केला.

.........

वाचली