शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

६५ मिमी पावसानंतरच वारसांना भरपाई, सरकारचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 02:29 IST

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे. कारण, ज्या दिवशी मृत्यू झाले, त्या दिवशी ६५ मिमी पाऊस झाला नसेल, तर मृतांचे नातलग मदतीला पात्र ठरत नाहीत, असा अत्यंत संतापजनक निकष मदत देताना नोकरशाहीने लागू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पावसाचे पाणी साचले असताना विजेचा शॉक लागून मरण पावलेली, झाड पडून मरण पावलेली किंवा पुराच्या पाण्यातून वाट काढताना बुडालेली व्यक्ती मदतीस पात्र ठरत नाही.गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांना भरपाईसाठी राज्य शासनाकडून २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या रकमेतून शासकीय मदतीचे वाटप सुरू आहे. जे पुराच्या पाण्यात वाहून गेले, दरड कोसळून मयत झाले अथवा वीज पडून मृत्यू झाले, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी पाऊस पडलेला असणे अनिवार्य आहे. तरच, मयत व्यक्तींचा परिवार शासनाच्या मदतीस पात्र ठरतो. जिल्ह्यात या निकषानुसार मृत पावलेल्या १३ व्यक्तींचे परिवार भरपाईस पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर अन्य विविध कारणांमुळे दगावलेल्यांनाही मदतीस अपात्र ठरवले आहे. सरकारची ही अट संतापजनक आहे. अशा अटींमुळे मृतांच्या नातलगांना मदतीपासून वंचित ठेवण्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.पावसाच्या काळात मरण पावलेल्या १२ व्यक्तींच्या परिवारांना ४८ लाखांची शासकीय मदत देण्यात आली आहे. एका मयत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक १० जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील केवळ तीन जणांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले आहेत. उर्वरित सात मयत व्यक्तींचे नातेवाईक मदतीस अपात्र ठरवल्यामुळे ते वंचित आहेत. यामध्ये तलावात बुडून मरण पावणाऱ्या दोन जणांचा, विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या दोन जणांचा तसेच स्पाइस अ‍ॅण्ड राइस हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शॉक लागून मरण पावलेल्या दोन जणांचा समावेश आहे. याखेरीज, पाण्याच्या टाकीत बुडून निधन झालेल्या एका व्यक्तीस आणि पोहण्यासाठी गेला असता बुडून दगावलेल्या एकाला शासनाच्या मदतीस अपात्र ठरवलेले आहे.कल्याण तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील चौघेही शासनाच्या मदतीस पात्र ठरवलेले आहेत. यामध्ये एक पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे, तर कल्याण येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या कम्पाउंडची भिंत पडून तिघे मयत झाले आहेत. त्यांच्या नातेवाइकास मदत दिली आहे. उर्दू शाळेची भिंत पडली, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी या मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडलेला होता. यामुळे त्यांचे नातेवाईक मदतीस पात्र ठरले, अन्यथा ते मदतीला अपात्र ठरले असते. पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा भिंत कोसळणे या घटना घडतात, तेव्हा अगोदर झालेल्या पावसामुळे किंवा बेकायदा बांधकामांमुळे त्या कोसळतात. त्या दिवशी झालेला पाऊस हा केवळ निमित्त असतो. त्यामुळे त्या दिवशी किती पाऊस झाला, हा निकष लावून मदत देणे हा तुघलकी निर्णय असल्याचे मृतांच्या नातलगांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्यातील त्या चौघांच्या परिवारास सुमारे १२ लाखांची मदत मिळाली आहे.भिवंडी तालुक्यातील पाचपैकी तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि एक वीज पडून दगावला आहे. त्यामुळे या चौघांचे परिवार मदतीस पात्र ठरले आहेत. यातील तिघांच्या परिवारांसही १२ लाख रुपये मिळाले, तर एकाचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असल्याचे समजते. उर्वरित एक नऊ वर्षांचा मुलगा तळघरात पाणी साचले असता, त्यात बुडून मयत झाला आहे. त्याला अपात्र ठरवल्यामुळे परिवारास मदत मिळालेली नाही.धबधब्यात बुडाल्यास भरपाईस अपात्रअंबरनाथमधील तिघांपैकी एकास पात्र ठरवून त्याच्या परिवारास चार लाखांची मदत दिली. अपात्रांपैकी एका रिक्षाचालकाच्या अंगावर झाडाची फांदी, विजेच्या तारा व शेड कोसळली. तसेच कोंडेश्वर धबधब्यात बुडलेल्या तरुणाचे नातेवाईकही मदतीस अपात्र ठरले आहेत.उल्हासनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ते मदतीस अपात्र ठरले. या दोघांपैकी एकाचा स्लॅब अंगावर पडून, तर दुसºयाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शहापूरच्या पुरात एकाचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्याच्या परिवारास मदत मिळावी, यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरthaneठाणेGovernmentसरकार