शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

६५ मिमी पावसानंतरच वारसांना भरपाई, सरकारचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 02:29 IST

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला असला, तरी केवळ १३ मृतांच्या नातलगांनाच शासनाची मदत मिळणार आहे. कारण, ज्या दिवशी मृत्यू झाले, त्या दिवशी ६५ मिमी पाऊस झाला नसेल, तर मृतांचे नातलग मदतीला पात्र ठरत नाहीत, असा अत्यंत संतापजनक निकष मदत देताना नोकरशाहीने लागू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पावसाचे पाणी साचले असताना विजेचा शॉक लागून मरण पावलेली, झाड पडून मरण पावलेली किंवा पुराच्या पाण्यातून वाट काढताना बुडालेली व्यक्ती मदतीस पात्र ठरत नाही.गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांना भरपाईसाठी राज्य शासनाकडून २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या रकमेतून शासकीय मदतीचे वाटप सुरू आहे. जे पुराच्या पाण्यात वाहून गेले, दरड कोसळून मयत झाले अथवा वीज पडून मृत्यू झाले, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी पाऊस पडलेला असणे अनिवार्य आहे. तरच, मयत व्यक्तींचा परिवार शासनाच्या मदतीस पात्र ठरतो. जिल्ह्यात या निकषानुसार मृत पावलेल्या १३ व्यक्तींचे परिवार भरपाईस पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर अन्य विविध कारणांमुळे दगावलेल्यांनाही मदतीस अपात्र ठरवले आहे. सरकारची ही अट संतापजनक आहे. अशा अटींमुळे मृतांच्या नातलगांना मदतीपासून वंचित ठेवण्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.पावसाच्या काळात मरण पावलेल्या १२ व्यक्तींच्या परिवारांना ४८ लाखांची शासकीय मदत देण्यात आली आहे. एका मयत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक १० जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील केवळ तीन जणांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले आहेत. उर्वरित सात मयत व्यक्तींचे नातेवाईक मदतीस अपात्र ठरवल्यामुळे ते वंचित आहेत. यामध्ये तलावात बुडून मरण पावणाऱ्या दोन जणांचा, विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या दोन जणांचा तसेच स्पाइस अ‍ॅण्ड राइस हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शॉक लागून मरण पावलेल्या दोन जणांचा समावेश आहे. याखेरीज, पाण्याच्या टाकीत बुडून निधन झालेल्या एका व्यक्तीस आणि पोहण्यासाठी गेला असता बुडून दगावलेल्या एकाला शासनाच्या मदतीस अपात्र ठरवलेले आहे.कल्याण तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील चौघेही शासनाच्या मदतीस पात्र ठरवलेले आहेत. यामध्ये एक पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे, तर कल्याण येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या कम्पाउंडची भिंत पडून तिघे मयत झाले आहेत. त्यांच्या नातेवाइकास मदत दिली आहे. उर्दू शाळेची भिंत पडली, त्या दिवशी कमीतकमी ६५ मिमी या मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडलेला होता. यामुळे त्यांचे नातेवाईक मदतीस पात्र ठरले, अन्यथा ते मदतीला अपात्र ठरले असते. पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा भिंत कोसळणे या घटना घडतात, तेव्हा अगोदर झालेल्या पावसामुळे किंवा बेकायदा बांधकामांमुळे त्या कोसळतात. त्या दिवशी झालेला पाऊस हा केवळ निमित्त असतो. त्यामुळे त्या दिवशी किती पाऊस झाला, हा निकष लावून मदत देणे हा तुघलकी निर्णय असल्याचे मृतांच्या नातलगांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्यातील त्या चौघांच्या परिवारास सुमारे १२ लाखांची मदत मिळाली आहे.भिवंडी तालुक्यातील पाचपैकी तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि एक वीज पडून दगावला आहे. त्यामुळे या चौघांचे परिवार मदतीस पात्र ठरले आहेत. यातील तिघांच्या परिवारांसही १२ लाख रुपये मिळाले, तर एकाचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असल्याचे समजते. उर्वरित एक नऊ वर्षांचा मुलगा तळघरात पाणी साचले असता, त्यात बुडून मयत झाला आहे. त्याला अपात्र ठरवल्यामुळे परिवारास मदत मिळालेली नाही.धबधब्यात बुडाल्यास भरपाईस अपात्रअंबरनाथमधील तिघांपैकी एकास पात्र ठरवून त्याच्या परिवारास चार लाखांची मदत दिली. अपात्रांपैकी एका रिक्षाचालकाच्या अंगावर झाडाची फांदी, विजेच्या तारा व शेड कोसळली. तसेच कोंडेश्वर धबधब्यात बुडलेल्या तरुणाचे नातेवाईकही मदतीस अपात्र ठरले आहेत.उल्हासनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ते मदतीस अपात्र ठरले. या दोघांपैकी एकाचा स्लॅब अंगावर पडून, तर दुसºयाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शहापूरच्या पुरात एकाचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. त्याच्या परिवारास मदत मिळावी, यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरthaneठाणेGovernmentसरकार