शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कंपन्यांमुळे चिखलोली धरण प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:54 PM

पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी : आतापर्यंत केवळ नोटिसा बजावल्या, कंपन्यांवर तातडीने कारवाईची गरज

अंबरनाथ : पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या चिखलोली धरणाचे पाणी शहरातील पूर्वेकडील विभागात वितरित करण्यात येते. हे पाणी पिवळसर रंगाचे येत असून पिण्यालायक नसल्याचे आढळले आहे. येथील रासायनिक कंपन्या या धरणात प्रदूषण करत आहेत. चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश तत्कालीन मंत्र्यांनीदेखील दिले होते. मात्र, या कंपन्यांना नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीच कारवाई झालेली नाही. परिणामी, पुन्हा चिखलोली धरणातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या धरणातील पाणीपुरवठा बंद करून एमआयडीसीकडून पुरवठा करण्याची मागणी होत आहे. केवळ काही कंपन्यांमुळे चिखलोली धरण प्रदूषित होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाºया चिखलोली धरणातून नियमित सहा दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, गेल्यावर्षी या धरणातील पाणी प्रदूषित आढळल्याने येथून नागरिकांना पाणीपुरवठा करणे बंद करण्यात आले होते. धरणात अवघे २० टक्के पाणी असताना ही बाब लक्षात आली होती. त्यावेळेस तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी २१ मे २०१८ रोजी पाहणी करून प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. तसे आदेशदेखील अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात हे धरण नसल्याने गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी ही लघुपाटबंधारे विभागाकडे गेली. त्यांनीदेखील धरणाची पाहणी करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसोबत दौरा केला. त्यानंतर धरणाच्या प्रदूषणाला जबाबदार काही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीसनंतर कंपन्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. तसेच संबंधित कंपन्यांवर गुन्हेही दाखल होणे गरजेचे होते. मात्र, दीड वर्ष उलटून गेल्यावरही या कंपन्यांवर आजपर्यंत कारवाई झालेली नाही.

एकीकडे कंपन्यांवर कारवाई थंडावलेली असताना दुसरीकडे धरणातील प्रदूषणाचे प्रमाण हे वाढतच गेले आहे. जे पाणी मार्च-एप्रिलमध्ये प्रदूषित होत होते, तेच पाणी आता आॅक्टोबरमध्येच प्रदूषित झाले आहे. त्यामुळे अंबरनाथ पूर्व भागाला दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येत आहे. भविष्यात चिखलोली धरणाचे अस्तित्व वाचविण्यासाठी धरणाला लागून असलेल्या कंपन्यांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. एमआयडीसीने धरणपात्रातही अनेक कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे धरणाला थेट धोका निर्माण झाला आहे. त्यातच या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव असल्याने भविष्यात पाण्याची पातळी वाढून ती रासायनिक कंपन्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी मुख्यमंत्री, मनसे नेते आ. राजू पाटील, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना संबंधित कंपन्यांवर कारवाईसंदर्भात निवेदन दिले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याने चिखलोली धरणाची गुणवत्ता धोक्यात आल्याचा आरोपही संदीप लकडे यांनी निवेदनात केला आहे.नागरिकांच्या जीविताला धोकाच्तीन वर्षांपूर्वी चिखलोली धरण परिसरात रासायनिक गोण्या आढळून आल्या होत्या. मात्र, आजपर्यंत कोणत्याही कारखान्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. आजही परिस्थिती जैसे थे आहे.च्चिखलोली धरणातून गढूळ, दूषित पाणीपुरवठा करण्यात आल्याने पूर्वेकडील हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून चिखलोली धरणाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.च्चिखलोली धरणातील पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंदर्भात एमआयडीसीशी चर्चा सुरू आहे. धरणातील प्रदूषित पाण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांनी सांगितले.