शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

भाजपा सरकारवर कम्युनिस्टांचा हल्लाबोल,  मुख्यमंत्री क्लीन चीट देतात- प्रकाश रेड्डी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 19:10 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला. 

डोंबिवली - डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला.     कॉ. शहीद भगतसिंग मित्र मंडळांच्या वतीने लोढा हेवन येथे रशियन क्रांतीकारक लेनिन, छत्रपतीशिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यातील जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महेश आवारे यांनी केले होते.  यावेळी भाकप सचिव अरूण वेळासकर, मुंबई पक्षाचे नेते सुबोध मोरे, अक्षय पाठक, काळु कोमास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.     रेड्डी यांनी देशातील व राज्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक व राजकीय परिस्थिती बाबत भाजपा सरकारला धारेवर धरत विविध युगपुरूषांची आठवण करून दिली. यावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निमिर्ती केली. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिवाजी महाराजांनी शेतक:यांना अभय दिला होता. परस्त्रीचा सन्मान केला होता. परंतु आज देशात स्त्रियाबाबत काय चालले आहे. आपल्या देशात ज्या घटना घडत आहेत त्यामुळे मान शरमेने खाली जाते. ज्योतिबा फुले यांनी भांडवलीशाही व भटशाही विरोधात आंदोलन केले. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणो शहरातील जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले असते. तर कुणी लोढा येथे दिसले नसते. घरे स्वस्त मिळाली असती. या देशात कार्पीरेट अंबानी यांचे राज्य जाऊन कामगार, शेतकरी, कष्टकरी, आदीवासी महिला यांचे राज्य यावे. समाजवाद यावे. रशियातील लेनिन क्रांतीचा परिणाम बाबासाहेब आंबडेकर , रविंद्रनाथ टागोरां वर झाला. या सर्व युगपुरूषांचे विचार घेऊन सरकारांच्या विरोधात लढले पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार