शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

डोंबिवलीत रासायनिक जलप्रदूषण नियंत्रित करणारा बायोकल्चर प्लांट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

कल्याण : डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बायो कल्चर प्लांट गुरुवारपासून ...

कल्याण : डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बायो कल्चर प्लांट गुरुवारपासून सुरू करण्यात आला आहे. बायोनेस्ट प्रक्रिया तत्त्वावर आधारित हा प्लांट आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार असल्याचा दावा कामा या कारखानदारी संघटनेने केला आहे.

या प्लांटची सुरुवात कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी यश फाउंडेशनचे अध्यक्ष केतन पटेल, उपाध्यक्ष यश पटेल, नरेंद्र पटेल, उदय वालावलकर, नारायण टेकाडे, राजू बेल्लोरे, कमल कपूर, चांगदेव कदम, मुरली अय्यर, राहुल कासलीवाल, निखिल धूत आदी उपस्थित होते. हा प्रकल्प बायोनेस्ट सिस्टीम या कंपनीचा आहे. सध्या या प्रकल्पाची क्षमता दहा हजार लीटर इतकी आहे. प्लांटचे तीन टाक्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे. कारखान्यातून आलेले रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील एका उंचावरील टाकीत सोडण्यात येते. खाली बसविलेल्या तीन टाक्यांत ठिबक सिंचन पद्धतीने हे पाणी सोडल्यावर टाकीत लावलेल्या झाडांमुळे रासायनिक सांडपाण्यातील कार्बन डायऑक्साईड कमी होऊन पाणी स्वच्छ होते. या प्लांटच्या उभारणीकरिता १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पातील गुंतवणूक ही एकदाच करावी लागते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर अन्य १५० कंपन्यांमध्ये हा बायोकल्चरचा प्रयोग केला जाणार असल्याचे सोनी यांनी सांगितले.

प्लांटमधील दहा चौरस मीटरच्या टाक्यात पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. या प्रक्रियेत सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे रसायन आणि रंगदेखील फस्त करतात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. या प्लांटमध्ये सांडपाण्यातील रसायनावर जगणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करण्यात आला आहे. ही प्रक्रियाच संपूर्णपणे नैसर्गिक आहे. या प्लांटमध्ये कोणत्याही महागड्या खर्चिक यंत्रांचा वापर केलेला नाही. कमी खर्चात अधिक परिणामकारक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेची तांत्रिक बाजू औरंगाबादच्या यश फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे.

-------------------------