शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

डोंबिवलीत रासायनिक जलप्रदूषण नियंत्रित करणारा बायोकल्चर प्लांट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

कल्याण : डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बायो कल्चर प्लांट गुरुवारपासून ...

कल्याण : डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बायो कल्चर प्लांट गुरुवारपासून सुरू करण्यात आला आहे. बायोनेस्ट प्रक्रिया तत्त्वावर आधारित हा प्लांट आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार असल्याचा दावा कामा या कारखानदारी संघटनेने केला आहे.

या प्लांटची सुरुवात कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी यश फाउंडेशनचे अध्यक्ष केतन पटेल, उपाध्यक्ष यश पटेल, नरेंद्र पटेल, उदय वालावलकर, नारायण टेकाडे, राजू बेल्लोरे, कमल कपूर, चांगदेव कदम, मुरली अय्यर, राहुल कासलीवाल, निखिल धूत आदी उपस्थित होते. हा प्रकल्प बायोनेस्ट सिस्टीम या कंपनीचा आहे. सध्या या प्रकल्पाची क्षमता दहा हजार लीटर इतकी आहे. प्लांटचे तीन टाक्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे. कारखान्यातून आलेले रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील एका उंचावरील टाकीत सोडण्यात येते. खाली बसविलेल्या तीन टाक्यांत ठिबक सिंचन पद्धतीने हे पाणी सोडल्यावर टाकीत लावलेल्या झाडांमुळे रासायनिक सांडपाण्यातील कार्बन डायऑक्साईड कमी होऊन पाणी स्वच्छ होते. या प्लांटच्या उभारणीकरिता १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पातील गुंतवणूक ही एकदाच करावी लागते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर अन्य १५० कंपन्यांमध्ये हा बायोकल्चरचा प्रयोग केला जाणार असल्याचे सोनी यांनी सांगितले.

प्लांटमधील दहा चौरस मीटरच्या टाक्यात पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. या प्रक्रियेत सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे रसायन आणि रंगदेखील फस्त करतात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. या प्लांटमध्ये सांडपाण्यातील रसायनावर जगणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करण्यात आला आहे. ही प्रक्रियाच संपूर्णपणे नैसर्गिक आहे. या प्लांटमध्ये कोणत्याही महागड्या खर्चिक यंत्रांचा वापर केलेला नाही. कमी खर्चात अधिक परिणामकारक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेची तांत्रिक बाजू औरंगाबादच्या यश फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे.

-------------------------