शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

मुंब्य्रातील वीज समस्येवरुन आ. आव्हाडांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा, वीज समस्या न सोडविल्यास जलभरो करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:13 IST

मुंब्य्रातील वीज सम्यसेबाबत आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजाळपोळ झाल्यास महावितरण असेल जबाबदारनवरात्रोत्सवात भारनियमन करु नये

ठाणे - मुंब्य्रातील वीज समस्येच्या मुद्यावरुन स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना उद्या जाळपोळ झाली किंवा तुमच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले गेले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच असाल असा धमकी वजा इशारा दिला असतांनाच, मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढील दोन दिवसात वीजेची समस्या निकाली काढली गेली नाही तर जेल भरो आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.                महावितरणने वीज टंचाई निर्माण होत असल्याने राज्यभर भारनियमन सुरु केले आहे. हे भारिनयमन सुमारे ६ ते ७ तासांचे आहे. त्याव्यतिरिक्त मुंब्रा भागात अतिरिक्त ७ ते ८ तासांचेही भारिनयमन केले जात आहे. त्यामुळे मुंब्रा शहर हे सुमारे १२ ते १४ तास अंधारात असते. परिणामी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणच्या मुख्य अधिकारी पुष्पलता चव्हाण यांना फोन करुन नुकताच या संदर्भात दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी मुंब्य्रातील वीज समस्येबाबत त्यांच्याशी चर्चा केली. आमची सहनशिलता संपली आहे, त्यामुळे उद्या जाळपोळ झाली किंवा तुमच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले गेले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच असाल असा इशारा दिला आहे. तसेच वीज समस्येचा नाहक त्रास येथील नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात तुमचे हुंडेगिरी हे अधिकारी साधा फोन सुध्दा घेत नाहीत, त्यामुळे वीजेची समस्या तत्काळ सुटली नाही तर उद्या जे काही घडेल त्याला आपणच जबाबदार असाल असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर मंगळवारी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शानू पठाण, सिराज डोंगरे, आशिरन राऊत, राजन किणी, अनिता किणी आदींच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांची भेट घेतली. यावेळी परांजपें यांनी महावितरण कंपनीला भारिनयमनाबद्दल जाब विचारला.                 नवरात्रोत्सवाच्या काळात सायंकाळी ७ ते १० या वेळेत भारिनयमन करू नये, एमआयडीसीकडून ज्या वेळेत पाणी सोडण्यात येत, त्यावेळेत भारिनयमन करण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच, महावितरण कडे सुमारे ५ हजार लोकांनी नवीन वीज जोडणीसाठी शुल्क अदा केले आहे. मात्र , केवळ मीटर नसल्याने जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत, त्या जोडण्या तत्काळ देण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी परांजपे यांनी केली. तसेच, या मागण्यांच्या संदर्भात आगामी दोन दिवसात मार्ग न काढल्यास जेल भरो आंदोलन करण्यात येईल , असा इशारा यावेळी कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांना देण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड