शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

कुलाबा वेधशाळेचे वादळी वाऱ्यानंतर धोक्याचे इशारे, मच्छीमारांचे नुकसान

By धीरज परब | Updated: May 8, 2025 00:25 IST

Mira Road Rain Update: ६ मे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वादळी वारे झोडपून काढू लागल्यावर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने रात्री १० च्या सुमारास वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. आधीच इशारा न मिळाल्याने भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील मच्छीमारांची तारांबळ उडून मोठे नुकसान झाल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. 

मीरारोड - ६ मे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास वादळी वारे झोडपून काढू लागल्यावर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने रात्री १० च्या सुमारास वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. आधीच इशारा न मिळाल्याने भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील मच्छीमारांची तारांबळ उडून मोठे नुकसान झाल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुटला. त्यामुळे समुद्र देखील खवळला.  मासेमारी हंगामाचा शेवटचा टप्पा असल्याने भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली आदी भागातील मासेमारी बोटी मोठ्या संख्येने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. मात्र अचानक आलेल्या ह्या वादळ व पावसा मुळे मच्छीमारांना बोटी माघारी घ्याव्या लागल्या आहेत. तर मासेमारीला जाण्यासाठी अनेक मच्छीमार नाखवांनी त्यांच्या बोटीत डिझेल, बर्फ, धान्य, खलाशी आदींची तयारी केली होती. मात्र वादळ - पाऊस ह्यामुळे मासेमारी करीत समुद्रात जाणे टाळावे लागले. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान झालेच पण वादळा मुळे त्यांची धावपळ उडाली. बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी लावण्या करता त्यांची तारांबळ उडाली.

वादळी वारा सुरु झाल्या नंतर केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळेने ६ मे च्या रात्री १० वाजता महाराष्ट्र आणि गोवा सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. ६ ते ११ मे साठी जारी केलेल्या इशाऱ्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या समुद्री भागात  ७ मे रोजी वादळासह तुरळक व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

८ मे गुरुवार रोजीसाठी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटसह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर ९ ते ११ मे दरम्यान किनारपट्टी भागात हलका पाऊस वा कोरडे वातावरणची शक्यता वर्तवली आहे. वादळा नंतर मच्छीमारांना धोक्याचा इशारा देणाऱ्या हवामान वेधशाळेच्या कारभारा बद्दल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस मुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना स्वतःचा आणि खलाश्यांच्या तसेच मासेमारी बोटीच्या सुरक्षितते साठी किनाऱ्याकडे धाव घ्यावी लागली. अनेक मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात जाण्या करता सर्व तयारी करून होते. मात्र त्यांचा बर्फ आदी वाया जाऊन नुकसान झाले आहे.  वेधशाळेने वेळीच इशारा दिला असता तर मच्छीमारांना आधीच खबरदारी घेता आली असती असे डिमेलो म्हणाले.

टॅग्स :RainपाऊसMira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे