शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

'क्लस्टरमुळे धोकादायक इमारतीच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:43 IST

एकनाथ शिंदे यांचा दावा, राज्यातील कामांची दिली माहिती

ठाणे : क्लस्टरसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष केला. आता हा प्रकल्प मार्गी लागणार असून केवळ धोकादायक इमारतीच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास होणार आहे. ठाणे जिल्ह्याशी संबंधित रखडलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री या नात्याने मार्गी लावल्याचे समाधान आहे. क्लस्टर, मेट्रो, सॅटिसमुळे येत्या काळात ठाण्याचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री तथा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

निवडणूक प्रचाराचा समारोप करताना शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ठाणे जिल्ह्यासोबतच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे क्षमता विस्तार, वाशी येथे खाडीवरील तिसरा पूल अशा राज्यात मार्गी लावलेल्या इतर प्रकल्पांचीही त्यांनी माहिती दिली.

गेल्या पाच वर्षांत आणि त्या आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तुलनेने गेल्या पाच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युतीच्या सरकारने अनेक प्रकल्प राबवले. ठाणे शहराचाही विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. शहरांतर्गत मेट्रो, कोपरी पूल रु ंदीकरण, पूर्वेला सॅटिस, ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वेस्थानक असे कित्येक प्रकल्प मार्गी लागले.

रस्त्यावरील वाहतूक कमी करण्यासाठी मेट्रो आणि जलवाहतूक प्रकल्प हाती घेतला आहे. क्लस्टर प्रकल्प हा केवळ जुन्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्यापुरताच मर्यादित नसून शहराचा नव्याने, सुनियोजित पद्धतीने विकास करण्याची सुवर्णसंधी आहे.काळू नदीवरील धरण प्रकल्पालाही चालना दिली. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला स्वतंत्र धरण मिळणार असल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचाही दावा त्यांनी केला. ठाणे जिल्ह्यातील १८ आणि पालघरच्या सर्व सहा जागा युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.एका प्रश्नाला उत्तर देताना बंडखोरांचा युतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अल्पसंख्याकांचा निधी खर्च नाही- दीपाली सय्यद

मुंब्रा परिसरात मुलांचे शिक्षण कमी आणि अमली पदार्थाच्या विळख्यात जास्त आढळले. अनेक ठिकाणी शौचालयांचीही सुविधा नाही. शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय विरोधकांकडून घेतले जाते, असा आरोप यावेळी मुंब्रा-कळवा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहर