शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

मलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंद

By admin | Updated: October 8, 2015 00:16 IST

खडेगोळवली येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रीया केंद्राचे काम भुयारी गटारी तुंबल्याने बंद पडले आहे. त्यामुळे शहरतील ६८ एमएलडी सांडपाणी थेट नाल्यात सोडले

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

खडेगोळवली येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रीया केंद्राचे काम भुयारी गटारी तुंबल्याने बंद पडले आहे. त्यामुळे शहरतील ६८ एमएलडी सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हे केंद्र व भुयारी गटारीवर कोट्यवधीचा खर्च केल्याचे दाखविले जात आहे. शहरात महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजने अंतर्गत सन-१९८४ ते ९३ साला दरम्यान भुयारी गटारी योजना राबविली आहे. सन-१९९३ सालची ३ लाख ६० हजार लोकसंख्या गृहित धरून २८ द.ल.लीटर क्षमतेची योजना कार्यान्वीत केली. आजमितीस शहराची लोकसंख्या १० ते ११ लाख आहे. भुयारी गटारीची क्षमता संपल्याने जागोजागी ओव्हर फलो होऊन गटारी तुंबल्या आहेत. शहरात एकूण ६८ एमएलडी सांडपाणी निर्माण होत आहे. तर २८ क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनिसा:रण केंद्र भुयारी जलवाहिन्या तुंबल्याने बंद पडले आहे. सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यावत मलनिसा:रण केंद्र उभारण्याची मागणी सर्वस्तरातून होत असून आयुक्त मनोहर हिरे यांनी केंद्र बांधण्याला प्राध्यान्य देणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच बहुतांश इमारतीतील व घरातील शौचालयांना सेफटी टँक नसल्याने सांडपाणी उघडया नाल्यात सोडले जात असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. भुयारी गटाराची क्षमता संपली असून त्या तुंबल्याने पावसाळयात ओव्हर फलो होत आहे. बहुतेक इमारती व घरातील शौचालयांना सेफटी टँक नसलयाने ते सक्तीचे करणे गरजे झाले आहे. पालिका आरोग्य विभागाने सेफटी टँक नसणाऱ्या इमारती व घरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांनी व्यक्त केला आहे. भुयारी गटारींची नवी योजना तातडीने राबविली नाहीतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे गटारी तुंबल्याचा अहवाल पालिकेकडे भुयारी गटारीची निगा राखण्यासाठी स्वत:चा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्याने कोटयावधीचा खर्च गटरी दुरस्तीवर केला जात आहे. खडेगोळवली मलनि:सारण केंद्र बंद असूनही त्यावर कोटयावधीचा खर्च पालिका करीत असल्याचे उघड झाले आहे. मलनिसा:रण केंद्र गटारी तुबंल्याने बंद असल्याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली आहे. मग त्यावर खर्च कशासाठी होतो, असा प्रश्न निर्माण झाला असून त्याच्या चौकशीचे मागणी होत आहे.