शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सफाई कामगारांना जुंपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:54 IST

भाईंदर पालिकेचा कारभार : प्रशासनावर नगरसेवकांचा दबाव, दोषी मोकाट

भार्इंदर : ओला व सुका कचरा वेगळा करून न दिल्यास कचरा उचलणार नाही तसेच नळजोडणी तोडू, असा महापालिकेचा इशारा नेहमीप्रमाणेच फुसकाबार ठरला. अतिउत्साही नगरसेवकांच्या दबावाखाली आयुक्त व प्रशासन आता चक्क कंत्राटी सफाई कामगारांनाच वर्गीकरण करायला लावत आहेत. नगरसेवक मात्र कचरा उचलायला लावल्याचे सेल्फी काढून सोशल मीडियावर चमकोगिरी करत आहेत.

नागरिक, व्यावसायिकांनी कचºयाचे वर्गीकरण करावे, असे महापालिकाच सतत सांगत असते. जनजागृतीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा पालिकेने केला आहे. शिवाय इमारतींमधून नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या. पत्रके व नोटिसा बजावल्या. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, यासाठी तीन कोटींचे डबे मोफत वाटले. धावगी डोंगरावर पुन्हा नव्याने घनकचरा प्रकल्प सुरू केला आहे. ५५० टनाची क्षमता असल्याचे पालिका सांगत असून सुक्या कचºयावर प्रक्रिया तर ओल्या कचºयापासून खतनिर्मिती चालवली आहे. गेली १२ वर्षे येथे बेकायदा कचºयाचे डम्पिंग पालिकेने चालवल्याने कचºयाचा डोंगर तयार झाला आहे. पाणी प्रदूषित होऊन शेती नापीक झाली आहे. दुर्गंधी, आग लागून होणारा धूर यामुळे आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. प्रकल्पाच्या जागेत राजरोस झालेल्या अतिक्रमणाकडे पालिका आणि लोकप्रतिनिधींनी डोळेझाक चालवली आहे. कचºयाचे वर्गीकरण न केल्यास पालिका कचरा उचलणार नाही तसेच नळजोडणी खंडित करू असा इशारा दिला होता. अनेक नागरिक व गृहनिर्माण संस्थांनी वर्गीकरणास सुरूवात केली. काही जण तर अनेक वर्षांपासून कचरा वर्गीकरण करून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. ओला-सुका कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने पालिका कचरा उचलत नाही. यामुळे नगरसेवकांनी प्रशासनावर राजकीय फायद्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. वर्गीकरण न करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन नगरसेवकांच्या सांगण्यावरून सफाई कामगारांना साचलेला कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी जुंपत आहेत.कचरा वर्गीकरणासाठी सफाई कामगारांना कामाला लावणे अपेक्षित नाही. नगरसेवकांनी सहकार्य करावे. त्यांचा असा राजकीय हस्तक्षेप बरोबर नाही. ते कायद्याचा विरोधात आहे. कचरा वेगळा न करणाºयांविरोधात दंडात्मक तसेच पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करू. पालिकेने सतत जनजागृती केली आहे व पुढेही करू.- बालाजी खतगावकर, आयुक्तकचरा वर्गीकरण करून न देणाºयात फेरीवाले व व्यावसायिकही आहेत; परंतु लोकप्रतिनिधींचे त्यांच्याशी अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सफाई कामगारांना राबवले जात आहे, हे अन्यायकारक आहे. हे बंद करावे अन्यथा आंदोलन करू. - सुलतान पटेल,शहर अध्यक्ष, श्रमजीवी कामगार संघटनाजबाबदार नागरिक म्हणून ओला व सुका कचरा वेगळा करून देणे आपले कर्तव्य आहे; पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी अधिक आहे. जे नागरिक व गृहनिर्माण संस्था कचरा वेगळा करून देतात त्यांचे कौतुक केले पाहिजे. जे करून देत नाही त्यांच्याबद्दल कठोर पवित्रा घेतला गेला पाहिजे.- भक्ती सचदेव, नागरिक

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरkalyanकल्याणGarbage Disposal Issueकचरा प्रश्न