शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

एमआयडीसीतील नाल्यांची ‘कामा’कडून सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:21 IST

रहिवाशांचा कचरा नाल्यात?; महापालिका, एमआयडीसीचे सहकार्य नसल्याची टीका

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा ते टेम्पोनाका आणि आशापुरा मंदिर ते गोलमैदान परिसरातील नाल्यांची बुधवारी कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेतर्फे स्वच्छता करण्यात आली. या नाल्यांमध्ये नागरी वस्तीत गोळा केलेला कचरा टाकण्यात येत असून, नाल्याचा प्रवाह रोखला गेल्याने ही स्वच्छता करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.एमआयडीसी, केडीएमसीकडून नियमित स्वच्छता झाली पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून मदत मिळत नाही. तसेच ते जबाबदारीही घेत नाहीत, अशी खंत सोनी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अनेकदा महापालिकेची मलनि:सारण वाहने बिनदिक्कतपणे नाल्यात किंवा मोकळ्या जागेत रिती केली जातात. अनेकदा परिसरातील मांस-मटणविक्रेते त्यांच्याकडील कचरा, मांस व अन्य घाण भरदिवसा नाल्यात टाकतात. औद्योगिक विभागात प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा राष्ट्रीय हरित लवाद यासारख्या संस्थांचे वरिष्ठ उच्च अधिकारी पाहणीसाठी येतात, तेव्हा त्यांना फक्त येथील अस्वच्छता नजरेस पडते. अशा वेळी उद्योग, सीईटीपीला जबाबदार धरले जाते. त्यामुळे कामा संघटना या परिसरात खाजगी तत्त्वावर स्वच्छतेची कामे करून घेते. मग असे असेल तर आम्ही एमआयडीसी, केडीएमसीकडे सर्व्हिस चार्ज, मालमत्ताकर का द्यायचा? संबंधित यंत्रणांनी उघड्यावर वा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्राकडे केंद्र, राज्य शासन या भागाकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवालही त्यांनी केला.कामा संघटनेने महापालिकेकडे लेखी तक्रार करावी. मी स्वत: लक्ष घालून नालेसफाई करून घेईन.- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसीएमआयडीसी परिसर २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिकेची आहे. येथील कर महापालिका वसूल करते. त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करावी.- संजय ननावरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

टॅग्स :MIDCएमआयडीसी